शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

पंचगंगा घाट परिसर पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 17:14 IST

जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी पंचगंगा गदी घाट विकसित करणे आवश्यक असून सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर :  जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी पंचगंगा गदी घाट विकसित करणे आवश्यक असून सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापुरात पंचगंगा नदी घाट विकसित करण्याच्या योजनेचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती हे होते.  पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही ठिकाणे विकसित करून पर्यटन वाढसाठी प्रयत्न करण्यात येत आहे.पर्यटन वाढले तर आपोआपच रोजगारही उपलब्ध होतील. हाच उद्देश ठेवून पंचगंगा घाट विकसीत करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील ५ कोटी रुपये खर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान करण्यात येत असून दोन वर्षातच पंचगंगा घाट परिसर शहरवासीयांचे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनेल. सकाळी नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्यांना चेंजिंग रुम आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात मोठी इंडस्ट्रीज येण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे किमान ४ ते ५ हजार लोकांना कामधंदा मिळेल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.पंचगंगा नदीचे प्रदूषण हा मोठा प्रश्न बनल्याने तो सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. शाहू छत्रपती यांनीही, पंचगंगा घाट सुशोभिकरणासह नदी शुद्धीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार अमल महाडिक, डॉ. सुजीत मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नियोजन अधिकारी सरिता यादव, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, किरण नकाते, रुपाराणी निकम, माधवी गवंडी, सरिता मोरे आदी उपस्थित होते. ----------पर्यटनवाढीसाठी दोन महिने सहलीचेजिल्ह्यात १५ एप्रिलपासून दोन महिने पर्यटन सहलीचे आयोजन केले असून आठवड्यातून किमान दोन दिवस सहलीचे आयोजन केले आहे. सहभागी पर्यटकांची राहण्याची, भोजनाची, वाहनाची सोय केली जाईल. जिल्ह्यातील दुर्लक्षीत आठ स्थळे दाखविण्यात येणार आहेत. राधानगरीत सुमारे आठ हजार फुलपाखरांचे गार्डन विकसीत करुन पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.-------------पुरातन मंदिरेही विकसितपंचगंगा नदीच्या पात्रात व परिसरात अनेक पुरातन मंदिर, दिपमाळा असल्याने त्याचीही डागडुजी करून तेही सुशोभीत करण्यात येणार आहे, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अशीही घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.----------नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गावांनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करावेत मंत्री पाटील म्हणाले, पंचगंगा शुध्दीकरण करणे आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, पंचगंगा आणि रंकाळ्यात सांडपाणी मिसळणार नाही प्रयत्न करावेत, तसेच पाळीव जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करू. नदीकाठच्या गावांनीही प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी त्यांनी गावातच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करावेत, त्यासाठी शासनस्तरावर निधी देऊ असेही आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.----------

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील