शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पानसरे हत्येचे चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल; चौघांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 01:53 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्याकडे सोमवारी दाखल केले.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्याकडे सोमवारी दाखल केले.आरोपपत्रामध्ये संशयित अमोल काळे (वय ३५, रा. पिंपरी-चिंचवड), वासुदेव सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत कुरणे (३७, रा. बेळगाव), अमित डेगवेकर (३८, रा. दोडामार्ग, सिंधुदुर्ग) या चौघांचा पानसरे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असून खून, खुनाचा प्रयत्न, साक्षीदारांच्या मदतीने हत्येचाकट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुमारे ८५ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत.विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी एसआयटीचे तपास अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर सादर केले.आजपर्यंत केलेल्या तपासाचा पुरवणी अहवाल एसआयटीने यापूर्वी उच्च न्यायालयात सादर केला आहे. पुरवणी दोषारोपपत्रामध्ये चौघा संशयितांकडून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून, ते पुराव्यानिशी न्यायालयासमोर सादर केले आहेत. हा संपूर्ण तपास गोपनीय आहे.तपासाबाबत उलट-सुलट चर्चासंशयित तावडेने कुरणेकडे पिस्तूल दिले. त्याने ते बेळगावला नेऊन नष्ट केले; तर सूर्यवंशी याने मोटारसायकलींची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये संशयितांकडून पिस्तूल आणि दुचाकी हस्तगत झाली नाही. पानसरे हत्येमध्ये गोळ्या झाडल्याचा आरोप सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांच्यावर केला आहे. दोघेही फरार आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात आठ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी सहाजणांना अटक केली.दोष सिद्ध झाल्यास शिक्षासंशयितांच्या विरोधात १२० (ब), कट रचणे, १०९ मदत करणे, ३०२ खुनाचा प्रयत्न, संगनमत करणे (३४), यासह बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संशयितांवर दोष सिद्ध झाल्यास आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते, असे अ‍ॅड. राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरे