शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पालघर द्या, भंडारा घ्या - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 06:14 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे.

नागपूर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. पाठिंब्यासाठी कोण पुढे येतो हे पाहूनच भंडारा-गोंदिया मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख भाजपाकडे होता.विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात आले होते. या वेळी पत्रकारांना ते म्हणाले, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीबाबात आम्ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ भूमिका घेतली आहे. पालघरमध्ये काय घडते, हे पाहून या मतदारसंघाची भूमिका जाहीर केली जाईल.विदर्भ विकासाच्या विरोधात शिवसेना नाही. विदर्भाच्या विकासासाठी वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. परंतु विकास हवा म्हणून वेगळे राज्य द्या, असे म्हणणे योग्य नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. विदर्भाला तोडण्याची भाषा करणाºयांवर राजद्रोह दाखल करावा, या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेचे ठाकरे यांनी समर्थन केले.‘लोकमत’च्या पुढाकाराचे केले स्वागत‘रिफायनरी’ प्रकल्प विदर्भात यावा, यासाठी ‘लोकमत’ने जनप्रतिनिधींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘लोकमत’मुळे या मागणीला पाठबळ मिळते आहे. हा चांगला पुढाकार आहे. नाणारला प्रकल्प होणार नाही हे निश्चित. त्यामुळे तो विदर्भात यायलाच हवा याचा पुनरुच्चारदेखील उद्धव ठाकरे यांनी केला.तरच पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यापावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यायला आमचा विरोध नाही. मात्र हे अधिवेशन केवळ दिखाव्यासाठी असता कामा नये. राज्य व विशेषत: विदर्भासाठी चांगले निर्णय होणार असतील, तरच पावसाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्यात यावे, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मला तरी पंतप्रधान व्हायचे नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे