शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:13 IST

निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये.

ठाणे: शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी तब्बल 29 हजार मतांनी विजय मिळवला. यानंतर आता शिवसेनेने मतांची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे. मतदानाच्या दिवसापासूनच शिवसेनेसह विरोधी पक्ष याठिकाणी मतदान यंत्रात (ईव्हीएम) बिघाड झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेचा हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे सह-संपर्क प्रमुख केतन पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली. 20,21, 22, 23 आणि 24 व्या फेरीत निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदारांची आकडेवारी आणि आमच्याकडे असलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये. 20,21, 22, 23 आणि 24 फेरीतील मतांची पुन्हा मोजणी करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे. 

भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र, वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित यांना दुपारी एकपर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे