शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:13 IST

निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये.

ठाणे: शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी तब्बल 29 हजार मतांनी विजय मिळवला. यानंतर आता शिवसेनेने मतांची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे. मतदानाच्या दिवसापासूनच शिवसेनेसह विरोधी पक्ष याठिकाणी मतदान यंत्रात (ईव्हीएम) बिघाड झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेचा हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे सह-संपर्क प्रमुख केतन पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली. 20,21, 22, 23 आणि 24 व्या फेरीत निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदारांची आकडेवारी आणि आमच्याकडे असलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये. 20,21, 22, 23 आणि 24 फेरीतील मतांची पुन्हा मोजणी करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे. 

भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र, वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित यांना दुपारी एकपर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे