शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:13 IST

निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये.

ठाणे: शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी तब्बल 29 हजार मतांनी विजय मिळवला. यानंतर आता शिवसेनेने मतांची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे. मतदानाच्या दिवसापासूनच शिवसेनेसह विरोधी पक्ष याठिकाणी मतदान यंत्रात (ईव्हीएम) बिघाड झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेचा हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे सह-संपर्क प्रमुख केतन पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली. 20,21, 22, 23 आणि 24 व्या फेरीत निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदारांची आकडेवारी आणि आमच्याकडे असलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये. 20,21, 22, 23 आणि 24 फेरीतील मतांची पुन्हा मोजणी करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे. 

भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र, वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित यांना दुपारी एकपर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे