शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

"असल्या सर्जिकल स्ट्राईक आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:46 IST

Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्या आणि त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी आतातपर्यंत उचललेली पावले, यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले की, पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी २७ बळी घेतले आहेत, हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत. हा मानवी संहार सरकारच्या गाफिलपणामुळे झालेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पहलगामधील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे अशी मागणी होत आहे. त्याबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे, असे विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले की, याबाबत आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की, पुलवामा हल्ल्यानंतरच पाकिस्तानवर हल्ला करायला हवा होता. पुलवामामध्ये ४० जवान ज्या पद्धतीने मारले गेले. आता ते मारले कुणी हा परत प्रश्न आहे. त्यात परत राजकारण येतं. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यानुसार जवानांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, असे वारंवार सांगितले जात होते. म्हणजे सरकारला त्यांना राजकारण करण्यासाठी मारायचं होतं, असं कुणी म्हटलं तर त्याला देशद्रोही ठरवतील. त्याला पाकिस्तानात चालले व्हा म्हणून सांगितलं जाईल, असा आरोपही राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही. उरीनंतर का हल्ला झाला नाही. सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो आम्ही पण गल्लीबोळात करतो बरं का, आम्ही पण असल्या स्ट्राईक करतो, असा टोलाही संजय राऊत यांनी केला. जसा हल्ला इंदिरा गांधी यांनी केला, लाल बहादूर शास्त्री यांनी केला. त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेताय, असा टोलाही राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकारPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला