शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:49 IST

Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्या आणि त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी आतातपर्यंत उचललेली पावले, यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले की, पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी २७ बळी घेतले आहेत, हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत. हा मानवी संहार सरकारच्या गाफिलपणामुळे झालेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पहलगामधील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे अशी मागणी होत आहे. त्याबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे, असे विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले की, याबाबत आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की, पुलवामा हल्ल्यानंतरच पाकिस्तानवर हल्ला करायला हवा होता. पुलवामामध्ये ४० जवान ज्या पद्धतीने मारले गेले. आता ते मारले कुणी हा परत प्रश्न आहे. त्यात परत राजकारण येतं. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यानुसार जवानांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, असे वारंवार सांगितले जात होते. म्हणजे सरकारला त्यांना राजकारण करण्यासाठी मारायचं होतं, असं कुणी म्हटलं तर त्याला देशद्रोही ठरवतील. त्याला पाकिस्तानात चालले व्हा म्हणून सांगितलं जाईल, असा आरोपही राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही. उरीनंतर का हल्ला झाला नाही. सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो आम्ही पण गल्लीबोळात करतो बरं का, आम्ही पण असल्या स्ट्राईक करतो, असा टोलाही संजय राऊत यांनी केला. जसा हल्ला इंदिरा गांधी यांनी केला, लाल बहादूर शास्त्री यांनी केला. त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेताय, असा टोलाही राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकारPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला