शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:49 IST

Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्या आणि त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी आतातपर्यंत उचललेली पावले, यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले की, पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी २७ बळी घेतले आहेत, हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत. हा मानवी संहार सरकारच्या गाफिलपणामुळे झालेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पहलगामधील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे अशी मागणी होत आहे. त्याबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे, असे विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले की, याबाबत आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की, पुलवामा हल्ल्यानंतरच पाकिस्तानवर हल्ला करायला हवा होता. पुलवामामध्ये ४० जवान ज्या पद्धतीने मारले गेले. आता ते मारले कुणी हा परत प्रश्न आहे. त्यात परत राजकारण येतं. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यानुसार जवानांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, असे वारंवार सांगितले जात होते. म्हणजे सरकारला त्यांना राजकारण करण्यासाठी मारायचं होतं, असं कुणी म्हटलं तर त्याला देशद्रोही ठरवतील. त्याला पाकिस्तानात चालले व्हा म्हणून सांगितलं जाईल, असा आरोपही राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही. उरीनंतर का हल्ला झाला नाही. सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो आम्ही पण गल्लीबोळात करतो बरं का, आम्ही पण असल्या स्ट्राईक करतो, असा टोलाही संजय राऊत यांनी केला. जसा हल्ला इंदिरा गांधी यांनी केला, लाल बहादूर शास्त्री यांनी केला. त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेताय, असा टोलाही राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकारPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला