शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

पॅडी ट्रान्सप्लांटरची मदत

By admin | Updated: July 19, 2016 03:51 IST

तालुक्यातील कान्होर गावात महिला बचत गटाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भातशेती करायला सुरुवात केली आहे.

अंबरनाथ : तालुक्यातील कान्होर गावात महिला बचत गटाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भातशेती करायला सुरुवात केली आहे. भातलागवडीसाठी त्यांनी आदर्श मानल्या गेलेल्या ‘पॅडी ट्रान्सप्लांटर’चा अवलंब केला आहे. जिल्ह्यात प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. अपुरे मनुष्यबळ व पारंपरिक पद्धतीमुळे आतबट्ट्याची ठरू लागलेल्या भातशेतीला यामुळे नवसंजीवनी मिळू शकेल. जमाखर्चाचा मेळ जमत नसल्याने सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी भातपीक घेणे टाळू लागले आहेत. त्यामुळे एकेकाळी भाताचे कोठार ही ठाण्याची असलेली ओळख मागे पडली आहे. वाडा कोलम ही भाताची जात आता केवळ नावापुरतीच उरली आहे. भातलागवड हे कष्टदायक काम असल्यामुळे त्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. एकेक रोप वाकून लावावे लागते. दीर्घ काळ हे काम केल्यास पाठदुखीचा त्रास होतो. त्यातूनही जे मजूर मिळतात, त्यांना पुरेसे प्रशिक्षण व अनुभव नसतो. परिणामी, अयोग्य पद्धतीने रोपांची लागवड केल्यामुळे भाताच्या उत्पादनात घट होते. यंत्रांमुळे या सर्व अडचणी दूर होऊन जिल्ह्यातील भात उत्पादनात क्र ांती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.भातलागवडविषयक या समस्यांवर पॅडी ट्रान्सप्लांटर हे यंत्र सहजपणे मात करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यंत्राद्वारे शेतात एकसारखी (प्रमाणित) रोप लागवड होते. त्यामुळे दोन रोपांमध्ये योग्य अंतर राखले जाऊन उत्पादनात वाढ होते. पारंपरिक पद्धतीने एक हेक्टर क्षेत्रात भातलागवड करायची असेल तर १० मजुरांना दोन दिवस लागतात. या यंत्राद्वारे हेच काम तीन तासांत होते. त्यामुळे मजुरांच्या समस्येवर हा चांगला उपाय असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले.पॅडी ट्रान्सप्लांटरला एका तासासाठी तीन लीटर इंधन लागते. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीनेही हे व्यवहार्य आहे. त्यांच्यामार्फत शेतकरी या यंत्रांचा वापर करणार आहेत. या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी १४ दिवसांची रोपे लागत असल्याचे कृषी अधिकारी आर.एच. पाटील यांनी सांगितले. ती रोपे प्लास्टिकच्या ताडपत्रीवर तयार केली जातात आणि १४ दिवसांनी रोपे तयार झाली की, ती ‘पॅडी ट्रान्सप्लांटर’मध्ये टाकून त्यांची लावणी केली जाते. ही सर्व कामे महिला करत असल्याने त्यांना नवा रोजगारही मिळाला आहे. ‘चूल आणि मूल’ ही ओळख आता पुसून आता महिला शेतात पुरु षांच्या बरोबरीने काम करताना दिसणार आहेत. (प्रतिनिधी)>असे आहे नवे तंत्र आणि मंत्र, असा होईल त्यातून भरघोस फायदादोन दिवसांत मजुरांकडून जेवढे भातलावणीचे काम होईल तेवढे काम या तंत्राने होईल फक्त तीन तासांत.शेत मजुरांच्या टंचाईवर मात करणे, उत्पादन खर्चात घट घडविणे, उत्पादनात वाढ घडवणे होईल शक्य.महागडी व कष्टप्रद शेती ठरेल अधिक लाभदायीयामुळे घटत असलेले भातशेतीचे प्रमाण वाढेल. तसेच तिच्यापासून दुरावणारी शेतकऱ्यांची तरुण पिढी पुन्हा एकदा वळू लागले शेतीकडे.