शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पॅडी ट्रान्सप्लांटरची मदत

By admin | Updated: July 19, 2016 03:51 IST

तालुक्यातील कान्होर गावात महिला बचत गटाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भातशेती करायला सुरुवात केली आहे.

अंबरनाथ : तालुक्यातील कान्होर गावात महिला बचत गटाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भातशेती करायला सुरुवात केली आहे. भातलागवडीसाठी त्यांनी आदर्श मानल्या गेलेल्या ‘पॅडी ट्रान्सप्लांटर’चा अवलंब केला आहे. जिल्ह्यात प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. अपुरे मनुष्यबळ व पारंपरिक पद्धतीमुळे आतबट्ट्याची ठरू लागलेल्या भातशेतीला यामुळे नवसंजीवनी मिळू शकेल. जमाखर्चाचा मेळ जमत नसल्याने सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी भातपीक घेणे टाळू लागले आहेत. त्यामुळे एकेकाळी भाताचे कोठार ही ठाण्याची असलेली ओळख मागे पडली आहे. वाडा कोलम ही भाताची जात आता केवळ नावापुरतीच उरली आहे. भातलागवड हे कष्टदायक काम असल्यामुळे त्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. एकेक रोप वाकून लावावे लागते. दीर्घ काळ हे काम केल्यास पाठदुखीचा त्रास होतो. त्यातूनही जे मजूर मिळतात, त्यांना पुरेसे प्रशिक्षण व अनुभव नसतो. परिणामी, अयोग्य पद्धतीने रोपांची लागवड केल्यामुळे भाताच्या उत्पादनात घट होते. यंत्रांमुळे या सर्व अडचणी दूर होऊन जिल्ह्यातील भात उत्पादनात क्र ांती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.भातलागवडविषयक या समस्यांवर पॅडी ट्रान्सप्लांटर हे यंत्र सहजपणे मात करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यंत्राद्वारे शेतात एकसारखी (प्रमाणित) रोप लागवड होते. त्यामुळे दोन रोपांमध्ये योग्य अंतर राखले जाऊन उत्पादनात वाढ होते. पारंपरिक पद्धतीने एक हेक्टर क्षेत्रात भातलागवड करायची असेल तर १० मजुरांना दोन दिवस लागतात. या यंत्राद्वारे हेच काम तीन तासांत होते. त्यामुळे मजुरांच्या समस्येवर हा चांगला उपाय असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले.पॅडी ट्रान्सप्लांटरला एका तासासाठी तीन लीटर इंधन लागते. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीनेही हे व्यवहार्य आहे. त्यांच्यामार्फत शेतकरी या यंत्रांचा वापर करणार आहेत. या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी १४ दिवसांची रोपे लागत असल्याचे कृषी अधिकारी आर.एच. पाटील यांनी सांगितले. ती रोपे प्लास्टिकच्या ताडपत्रीवर तयार केली जातात आणि १४ दिवसांनी रोपे तयार झाली की, ती ‘पॅडी ट्रान्सप्लांटर’मध्ये टाकून त्यांची लावणी केली जाते. ही सर्व कामे महिला करत असल्याने त्यांना नवा रोजगारही मिळाला आहे. ‘चूल आणि मूल’ ही ओळख आता पुसून आता महिला शेतात पुरु षांच्या बरोबरीने काम करताना दिसणार आहेत. (प्रतिनिधी)>असे आहे नवे तंत्र आणि मंत्र, असा होईल त्यातून भरघोस फायदादोन दिवसांत मजुरांकडून जेवढे भातलावणीचे काम होईल तेवढे काम या तंत्राने होईल फक्त तीन तासांत.शेत मजुरांच्या टंचाईवर मात करणे, उत्पादन खर्चात घट घडविणे, उत्पादनात वाढ घडवणे होईल शक्य.महागडी व कष्टप्रद शेती ठरेल अधिक लाभदायीयामुळे घटत असलेले भातशेतीचे प्रमाण वाढेल. तसेच तिच्यापासून दुरावणारी शेतकऱ्यांची तरुण पिढी पुन्हा एकदा वळू लागले शेतीकडे.