शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

गारपीटग्रस्तांसाठी आज पॅकेजची घोषणा

By admin | Updated: December 15, 2014 03:49 IST

नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाणसह काही भागांत बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस झालेला बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे उद््ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत राज्य सरकारतर्फे सोमवारी हिवाळी अधिवेशनात विशेष पॅकेजची घोषणा केली जाईल, असा शब्द रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे सुतोवाचही त्यांनी केले.नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाणसह काही भागांत बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रविवारी तातडीने नाशिक जिल्ह्णाचा दौरा केला. दिंडोरी तालुक्यात तळेगाव वणी आणि सोनजांब तसेच चांदवड तालुक्यातील शिंदवाड आणि वडनेर भैरव येथेत्यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. कर्जमाफी झालीच पाहिजे या शेतकऱ्यांच्या मागणीवर अधिवेशनामुळे मला घोषणा करता येणार नाही. परंतु त्याबाबत अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असे सांगून त्यांनी कर्जमाफीचे सुतोवाच केले. शेतकऱ्यांच्या मागे कर्जफेडीसाठी तगादा लागू नये, तसेच पुढील हंगामात त्यांची कर्ज काढण्याइतपत पत निर्माण झाली पाहिजे याचा विचार करून सरकार निर्णय घेईल. नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा केली जाईल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी तत्कालिक मदत म्हणून सर्व प्रकारची कर वसुली थांबविली जाईल. वीजबिलांसाठी शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आदी दौऱ्यात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)> फळबागांसाठी असलेल्या पीकविमा योजनेतील अनेक निकष आणि अटींमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नाही. त्याचा विचार करून आता नव्या निकषांसह नवीन पीकविमा योजना आखण्यात येणार असून, लवकरच त्याची घोषणा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.