शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

नेमलेले पीए, पीएस, ओएसडी टेम्पररीच; मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवत उसनवारी तत्वावर कर्मचारी

By यदू जोशी | Updated: February 25, 2025 06:37 IST

सातत्याने त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. जे गडबड करतील त्यांना काढले जाईल. ‘पारदर्शक कारभार’ ही सरकारची टॅगलाइन असेल.

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंत्र्यांकडे सध्या जे पीए, पीएस, ओएसडी नेमले गेले आहेत ते पाच वर्षे राहतीलच असे नाही, त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळले तर त्यांना मध्येच घरी बसावे लागणार आहे. या शिवाय ‘उसनवारी’ (लोन) तत्वावर आपापल्यामंत्री कार्यालयात अनेकांची भरती केलेल्या मंत्र्यांना चाप बसविला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, मंत्री कार्यालयांमधील पीए, पीएस, ओएसडी नियुक्तीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत. हे अधिकारी कसे वागतात, चुकीचे निर्णय घेतात का? पारदर्शक कारभारासाठी भूमिका बजावतात की नाही, यावर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असेल. सातत्याने त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. जे गडबड करतील त्यांना काढले जाईल. ‘पारदर्शक कारभार’ ही सरकारची टॅगलाइन असेल.

मगच नावे झाली निश्चितविविध मंत्र्यांकडून सुचविलेल्या नावांची छाननी झाली. त्यांची विश्वासार्हता, आधीच्या नोकरीच्या ठिकाणी असलेली त्यांची प्रतिमा या बाबत बारीकसारीक तपशील मागविला गेला आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी नावांना मंजुरी दिली, असेही सूत्रांनी सांगितले.

उसनवारी कशासाठी?अनेक मंत्री कार्यालयांमध्ये मुख्यमंत्र्यांची नजर चुकवून मर्जीतील कर्मचाऱ्यांना उसनवारी तत्वावर आणले गेले आहे. एका मंत्र्याने दुसऱ्या मंत्र्याच्या अखत्यारितील कर्मचारी, अधिकाऱ्यांची सेवा आपल्या कार्यालयासाठी घ्यायची पण त्यांचा पगार मात्र मूळ विभागातूनच निघेल, अशी ही उसनवार पद्धत आहे.

तिचा फायदा घेऊन काही मंत्र्यांनी तर २०-२५ जणांना नेमले आहे. त्यातील बहुतेक जण हे गडबड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. निवृत्त अधिकाऱ्यांनाही घेतले आहे. ही माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने किती जणांना उसनवारीवर नेमले आहे याची यादी मागविली आहे.   

टॅग्स :Mantralayaमंत्रालय