शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘झोपु’ योजनेतून ‘त्या’ महापालिका वगळल्या

By admin | Updated: March 4, 2016 03:09 IST

झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजनेचा अधिनियम अखेर राज्य शासनाने राज्यातील १४ महापालिका आणि १९६ नगरपालिकांच्या क्षेत्रात लागू केला आहे.

नारायण जाधव, ठाणेझोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजनेचा अधिनियम अखेर राज्य शासनाने राज्यातील १४ महापालिका आणि १९६ नगरपालिकांच्या क्षेत्रात लागू केला आहे. मात्र, महापालिकांचा जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील केवळ ठाणे आणि उल्हासनगर या दोन महानगरांनाच ‘झोपु’ लागू केली असून, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी, वसई-विरारसह अंबरनाथ-बदलापूर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल व खोपोली नगरपालिका क्षेत्रात ती लागू न करता, तेथील झोपडीधारकांना मात्र ठेंगा दाखविला आहे. ठाणे-उल्हासनगरची निवडणूक वर्षभरावर आल्याने राजकीय लाभ उठवण्यासाठीच भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने ‘झोपु’त या दोन महानगरांचा समावेश केल्याची चर्चा आहे.राजकीय नेते आणि झोपडीधारकांची नाराजी टाळण्यासाठी याबाबतचा निर्णय राज्य सरकारने ‘चोरी चोरी चुपके चुपके’ घेतल्याचे खास सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.सध्या राज्यात राजधानी मुंबईसह पुणे आणि नागपूर या तीन महानगरांतच ही योजना होती, तर इतर महानगरांत ती लागू केलेली नव्हती. यामुळे वाढते नागरीकरण झालेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यांतील सात महापालिकांसह राज्यातील सर्वच महानगरांत आणि शहरात ती लागू करण्याची मागणी होत होती. त्यातच राज्याच्या गृहनिर्माण विभागाने ३० मे २०१४ रोजी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील सात महापालिकांसह मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील आठ नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या उत्थानासाठी मुंबई, नागपूर, पुण्याच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करता येणे शक्य आहे का किंवा अन्य कोणती योजना राबविणे शक्य होईल, याच्या आढाव्यासाठी अभ्यासगट नेमला होता. या अभ्यासगटास वारंवार मुदतवाढ दिली. त्यानंतर, त्यांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत अखेरची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार, या अभ्यासगटाने आपला अहवाल शासनास सादर केल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. १४ महापालिकांसह१९६ नगरपालिकांत अंमलबजावणीकेवळ एमएमआरडीए क्षेत्रच नव्हे, तर राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रांत ‘झोपु’ लागू केली आहे. यानुसार ठाणे, उल्हासनगर, नाशिक, मालेगाव, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नांदेड-वाघाडा, अकोला, अमरावती, जळगाव, अहमदनगर, धुळे, परभणी आणि सांगली या १४ महापालिकांसह पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणूसह रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, पेण, उरण, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, माथेरान, कर्जत या नगरपालिकांसह १९६ नगरपालिका क्षेत्रात ती २९ जानेवारी २०१६ पासून लागू केली आहे. बीएसयूपी-क्लस्टर-झोपुची सांगड कशी घालणार? : सध्या काही शहरांत बीएसयूपी योजना सुरू आहे, तसेच नुकतेच ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंट लागू केले आहे. या सर्वांची ‘झोपु’शी कशी सांगड घालणार, हासुद्धा एक प्रश्न निर्माण होणार आहे.प्रमुख शहरांत नाराजी : राज्यात सर्वात जास्त झोपडपट्टी असलेल्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, भिवंडी, वसई-विरारसह अंबरनाथ-बदलापूर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल व खोपोली नगरपालिका क्षेत्रात ती लागू न केल्याने तेथील झोपडीधारकांचे पक्क्या घरात जाण्याचे स्वप्न भंगले आहे.