शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 21:26 IST

शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आमचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे," असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. हिंदुत्वाचा भगवा, शिवधनुष्य आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडेच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच आमचं प्रतिबिंब!यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या पक्षात जी वाढ होत आहे, ती सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, या बाळासाहेबांच्या तत्वाचेच हे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बाळासाहेबांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेशी गद्दारी!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर महाराष्ट्राचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. "बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला या लोकांनी शिवसेनेला बांधण्याचे काम केले," अशी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. "मुख्यमंत्रीपदासाठी जे लाचार झाले, ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सत्तेसाठी तडजोड करणार नाही!"सत्तेच्या खुर्चीसाठी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. हिंदुत्वाची आम्ही कधी प्रतारणा करणार नाही, हे वचन आम्ही दिले आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोकांना निवडणुका आल्यावरच कार्यकर्त्यांची आठवण येते, अशी टीका करत त्यांनी "हम दो, हमारे दो" असे म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंना थेट सवाल"बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचा हिशोब द्या. आता म्हणता आम्ही हिंदुत्व सोडले नाही, मग बाळासाहेबांना 'हिंदुहृदयसम्राट' तुम्ही का म्हणत नाही?" असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन