शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी: खासदार सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:00 IST

साहित्य कला संवादाच्या समारोपावेळी मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी आहे. त्यामुळे ते आमचे शत्रू नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रविवारी केले. कुणाशी वाद झाला तरी चालेल; पण तो अगदी टोकाचा नसावा. दुसऱ्यांचे विचार ऐकण्याची, त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची ताकद असली पाहिजे. परंतु, आज राजकारणात विचार मोडून टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तो मोडून काढला पाहिजे, असे खा. सुळे म्हणाल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘विद्वेषाच्या काळात प्रेमाचा उद्गार’ या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य कला संवादाच्या समारोपाच्या सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण निगुडकर, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्षा नीरजा आणि आंतरभारती कला भवनाचे अध्यक्ष युवराज मोहिते उपस्थित होते.

  • आमच्यावर कुणीही टीका केली तर मजा येते. कारण, जेवढी टीका कराल तेवढी आमची मते वाढतात. आमच्याबद्दल ते असे विचार करतात, हे ऐकून मजा येते. कुणाशी भांडण करणे मला आवडत नाही. चर्चेमधून कोणतीही समस्या सुटू शकते. त्यावर मार्ग निघू शकतो. अशावेळी उद्रेक होण्याची वाट का पहावी?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
  • तुम्ही प्रभू रामाचे नाव घेता. मी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. माझीही त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा आहे; पण मी जाहीरपणे सांगत नाही. श्रद्धा कुणावरही असावी; पण अंधश्रद्धा असू नये. पंढरपूरच्या पांडुरंगावरही माझे  प्रेम आहे; पण त्यासाठी सतत देवळात जाण्याची गरज नाही. तुम्ही जे काही कराल ते अगदी चांगल्या मनाने करा. तो तुमच्या पाठीशी उभा राहतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस