शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

... नाही तर पगार कापणार; राज्य सरकारची कर्मचाऱ्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:56 IST

प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आठवड्यात किमान एक दिवस कार्यालयात हजर राहतील. विविध कारणांनी पूर्व मंजूर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वांना आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजर राहावेच लागेल.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नेमून दिलेल्या दिवशी शासकीय कर्मचारी, अधिकारी कार्यालयात हजर राहिले नाहीत तर त्या संपूर्ण आठवड्याची अर्जित वा विनावेतन रजा गृहीत धरण्यात येईल, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी काढला.

प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आठवड्यात किमान एक दिवस कार्यालयात हजर राहतील. विविध कारणांनी पूर्व मंजूर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वांना आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजर राहावेच लागेल. कर्मचाºयांनी कोणत्या दिवशी उपस्थित राहायचे आहे, याबाबतचा आदेश विभागप्रमुख काढतील. नेमून दिलेल्या दिवशी कार्यालयात हजर राहणे अनिवार्य असेल. लॉकडाऊनच्या काळात ज्या अधिकारी-कर्मचाºयांनी विनापरवानगी मुख्यालय सोडले आहे, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

नेमून दिलेल्या दिवशी कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्या संपूर्ण आठवड्याची अर्जित/विनावेतन रजा मानली जाईल. एखाद्या कर्मचाºयाला आठवड्यात तीन दिवस कामावर येण्याचे आदेश विभागप्रमुखांनी दिलेले असतील व तो कर्मचारी एकच दिवस हजर राहिला तर उर्वरित दोन दिवसांची अर्जित/विनावेतन रजा मानली जाईल. तो निर्णय विभागप्रमुख घेतील. कर्मचाºयांची उपस्थिती विचारात घेऊनच यापुढे वेतन देयके तयार करण्यात येतील व तसे प्रमाणपत्र पगाराच्या देयकांसोबत जोडणे आहरण व संवितरण अधिकाºयांसाठी आवश्यक असेल. त्यानंतरच कोषागार कार्यालय वेतन पारित करतील.

ई-मेल तसेच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर ग्राह्यधरणारलॉकडाऊनच्या काळात शासकीय कामकाजासाठी ई-मेल,एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅपचा वापर ग्राह्यधरण्यात येणार आहे. या माध्यमातून येणारे प्रस्ताव व मान्यता गृहीत धरली जाईल. सामान्य प्रशासन विभागाने हे परिपत्रक शुक्रवारी काढले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGovernmentसरकार