शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

...अन्यथा पुन्हा केडीएमसीत निवडणूक लढवणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2015 03:39 IST

केंद्रात आणि राज्यात बदल घडवलात ना? मग आता कल्याण-डोंबिवलीतही बदल घडवा! मला पूर्ण सत्ता द्या, या शहरांचा नाशिकप्रमाणे कायापालट केला नाही, तर मी पुन्हा या ठिकाणी

डोंबिवली : केंद्रात आणि राज्यात बदल घडवलात ना? मग आता कल्याण-डोंबिवलीतही बदल घडवा! मला पूर्ण सत्ता द्या, या शहरांचा नाशिकप्रमाणे कायापालट केला नाही, तर मी पुन्हा या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत केले. केडीएमसी निवडणुकांमध्ये पक्ष प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. २० वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही. त्यामुळेच आजही या ठिकाणचा नागरिक दडपणात जीवन जगत आहे. येथे पायाभूत सुविधांची बोंब आहे, अनधिकृत बांधकामे सररासपणे उभी राहत आहेत. खेळांची मैदाने, उद्याने नाहीत. करमणुकीची साधने नाहीत ही या शहरांची शोकांतिका आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. हे चित्र बदलण्यासाठी एकदा तरी संपूर्ण सत्ता माझ्या हाती द्या, मग बघाच मी काय करतो ते, असे ते म्हणाले. ठाणे जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जेथे ठाणे, केडीएमसी, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई, उल्हासनगर या सहा महानगरपालिकांचा समावेश आहे. महापालिका कधी निर्माण होतात जेव्हा लोकसंख्या वाढते. कुठून आली ही माणसे? हे सर्व बाहेरून आलेले आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर नायजेरीयनही वस्तीला आलेले आहेत. ती माणसे मारामाऱ्या करतात, ड्रग्जचा व्यवसाय करतात. अबू आझमींसारखी माणसे कोणामुळे निवडून येतात? आझमगढ, यूपी आदी ठिकाणांहून येथे आलेल्या परप्रांतीयांमुळेच ना, असा सवालही त्यांनी केला. हेच या ठिकाणीही होत आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र आज मी येथे आलो आहे १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतो, असे म्हणताच प्रचंड टाळ्या-घोषणा झाल्या. त्यावर राज म्हणाले, अरे वेड्यांनो, तुम्ही असेच फसता. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस येथे आले आणि ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. अहो, पण पैसे येणार कुठून? राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे.परदेशातून पैसे आणायचे तर ‘जपान’मध्ये वाकून वाकून डोके गुडघ्याला टेकायला लागले. पण उपयोग काही नाही. त्यामुळे केंद्र व राज्यात पैसाच नाही, तर हे देणार कुठून? असा टोलाही लगावला. काँग्रेस-भाजपात फरक काय? केंद्रासह राज्याच्या आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये फरक काय आहे? आधीही हायकमांडला विचारायला लागत होते आणि आताही.. मग बदल काय झाला? १०० दिवसांत अच्छे दिन येणार होते, आता तर ५०० दिवस झाले कुठे गेले अच्छे दिन? तूरडाळ, मूगडाळ यांचे भाव गगनाला भिडले आहेत. राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तरी पॅकेज कसले जाहीर करतात हे समजतच नाही. त्यामुळेच मतदारांनी जागृत राहावे, हे सगळे सारखेच आहेत. निवडणुका आल्या की गोड बोलायचे नंतर ओरबाडायचे अशी या सर्वांची वृत्ती आहे. अनधिकृत बांधकामांमध्ये सर्वसामान्यांची घरे जातात. त्यांच्या डोक्यावर सातत्याने टांगती तलवार असते. महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, बिल्डर यांच्यावर कारवाई होत नाही. पैसे देऊन ते सुटतात, पण सर्वसामान्यांची मात्र परवड होते. शिवसेनेला टोला : यांचे काय तर म्हणे विचारांचे सोने लुटा, तुम्ही विचार घ्यायचे, त्यांनी महापालिका लुटायची. हे असेच सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे वाभाडे काढले.विकास बघायचाय चला नाशिकला...मला नासिकमध्ये पूर्ण सत्ता मिळाली. ३.५ वर्षांत काय बदल झाला ते बघा. कोट्यवधीचे रस्ते झालेत, भारतात कुठेही नसतील असे ते आहेत. तेथे गार्डन, बाग, खेळाची मैदाने आहेत. इथे ती नाहीत. नुकतेच चिल्ड्रन्स ट्रॅफिक गार्डन निर्माण केले. ते बघायला या. मी काही फडवणीस नाही, मी राज ठाकरे आहे. येथे पूर्ण सत्ता दिल्यास ठाण मांडून बसेन, बदल घडवेन. येणार आणि जाणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.