शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

Vidhan Sabha 2019: नाराजांसाठी मनसे ठरणार पर्याय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 14:43 IST

लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता तटस्थ राहण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. भाजप-शिवसेना यांच्या युतीची चर्चा सुरु असून तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा निर्णय झाला आहे. तर मनसेने सुद्धा १२५ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रमुख पक्षातील नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना आमचा पर्याय उपलब्ध असणार असल्याचा खुलासा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता तटस्थ राहण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यांनतर विधानसभा निवडणूक सुद्धा ते लढवणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असून, सुमारे १२५ ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा राज ठाकरेंच्या सभा गाजणार असल्याचे निश्चित झाले आहे.

युती आणि आघाडीच्या पक्षातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिकीट न मिळलेल्या इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्वाचा पक्षातील नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना आमचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. तर  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील बंडखोर पुढील काळात मनसेमध्ये जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिकमधील मतदारसंघावर मनसेचा अधिक जोर असणार आहे. या सबंधी उमेदवारांच्या सभा सुद्धा झाल्या आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभा सुद्धा होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज यांचा 'लाव रे तो व्हिडिओ'चा फॅक्टर कितपत चालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.