शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

इतर मंत्री होतील का ‘शहा’णे?

By admin | Updated: June 5, 2016 00:33 IST

‘माझ्या कानावर काही मंत्र्यांबाबत काही तक्रारी येत आहेत. सगळ्यांनी काळजी घ्या. पक्षाची, या सरकारची बदनामी होईल, असे वागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

- यदु जोशी, मुंबई

‘माझ्या कानावर काही मंत्र्यांबाबत काही तक्रारी येत आहेत. सगळ्यांनी काळजी घ्या. पक्षाची, या सरकारची बदनामी होईल, असे वागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मे २०१५ मध्ये कोल्हापुरात सतर्क केले होते. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने आता इतर मंत्री तरी ‘शहा’णे होतील का, असा सवाल एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने समोर आला आहे. ‘पक्ष कार्यासाठी मंत्र्यांना वर पैसे पोहोचवावे लागतात’ अशी पद्धत आपल्या पक्षात नाही. ही काही काँग्रेस नाही. त्यामुळे पक्षाला द्यावे लागतात, या सबबीखाली कोणी पैसा जमा करण्याची काहीही गरज नाही. पक्ष त्यासाठी समर्थ आहे. आपल्याला पारदर्शक कारभार करायचा आहे. तेच आपल्या कामाचे मूख्य सूत्र असले पाहिजे, असेही शहा यांनी सुनावले होते. चिक्की प्रकरण त्या वेळी ताजे होते. भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या अपेक्षांची ही दिशा महाराष्ट्रातील मंत्र्यांना फारशी समजली नाही, असे आता दिसते. अर्धा डझन मंत्री या ना त्या निमित्ताने वादात अडकले. अंतस्थ गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्यातील कोणत्या मंत्र्याचे काय-काय चालले आहे, याचा इत्थंभूत ‘फीड बॅक’ नियमितपणे अमित शहा यांना मिळत असतो. तशी यंत्रणाच त्यांनी गुप्तपणे उभारली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत:ची पारदर्शक प्रतिमा टिकवून ठेवण्याबाबत नेहमीच अतिशय सावध आणि संवेदनशील असतात. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याचा दावा करून, कोणी तुमच्याकडून नियमबाह्य कामे करवून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याला बाहेरचा रस्ता तर दाखवाच, पण अशा प्रकाराची माहिती तत्काळ मला द्या, असे तोंडी आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गुप्तवार्ता विभागाची नजरमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री कार्यालयांमधील पीए, पीएस यांच्या हालचालींवर गुप्तवार्ता विभागाची नजर असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी गुप्तवार्ता विभागाच्या एका ज्येष्ठ महिला अधिकाऱ्याने दोन पीएंना बोलावून घेतले, त्यांची चौकशी केली. त्यांच्याबद्दल असलेल्या तक्रारीही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. तेव्हापासून ते पीए सुधारले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.झाली होती चाचपणी!खडसे भाजपातून बाहेर पडलेच, तर त्यांच्यासोबत कोणी बाहेर पडेल का, त्यांनी राजीनामा दिला तर उमटणारी संभाव्य प्रतिक्रिया काय असेल, याबद्दल भाजपाकडून आधीच चाचपणी करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे खासदार, आमदार यांची मते जाणून घेण्यात आली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित मानले गेले होते. खडसे पक्षातून बाहेर पडण्याची चूक करणार नाहीत आणि समजा त्यांनी उद्या तसे केले, तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असे त्यांचे समर्थक म्हणविणाऱ्यांनी पक्षाला सांगितले होते, अशीही माहिती आहे.