शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सेंद्रीय शेती हद्दपार !

By admin | Updated: May 28, 2014 23:36 IST

कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंगरूळपीर : अल्प खर्चात भरघोस उत्पन्न मिळावे आणि दर्जेदार उत्पादित पीक मिळावे या उदात्त हेतूने शासनाने मागील सहा वर्षापूर्वी शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीवर भर द्यावा या संदर्भात गावोगावी जनजागृती अभियान राबविले होते. मात्र अलीकडच्या काळात कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या अतोनात खर्चामुळे शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येचे कारण लक्षात घेऊन शासनाने जनजागृती अभियानाचा उपक्रम हाती घेवून गावोगावी जाऊन शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती फायदेशीर आहे याचे महत्व पटवून दिले. एवढेच नव्हे तर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक शेतकर्‍याने अल्प खर्चात भरघोस उत्पन्न देणार्‍या सेंद्रीय शेतीवर विशेष भर देण्यात आला होता. वारंवार रासायनिक व कीटकनाशकांचा वापर केल्याने जमिनीची पोत बिघडून जमीन बंजर होते. त्यामुळे सेंद्रीय शेतीचे अनेक फायदे लक्षात घेऊन तालुक्यातील गणेशपूर, पोटी, चांभई, कासोळा, तर्‍हाळा, येडशी, बेलखेड, मसोला, धोत्रा, घोटा, मंगळसा, वनोजा, खरबी या गावातील बहुतांश शेतकर्‍यांनी पुढाकार घेऊन सेंद्रीय शेती करण्याकडे कल वाढविला होता. यामध्ये विशेषत: कापूस, सोयाबीन, गहु, हरभरा आदी पीके सेंद्रीय पद्धतीने घेण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालिन जिल्हाधिकारी करवंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी गणेशपूर येथील शेतकर्‍यांनी सेंद्रीय पद्धतीने कापूस पीकविला होता. तेव्हा तेथील शेतकर्‍यांना बजारपेठेतील मूल्यापेक्षा ८00 रूपये जास्त दराने भाव मिळाला होता. सेंद्रीय शेतीला पुरक म्हणून अनेक गावामध्ये गांढूळ खत प्रकल्प देण्यात आले होते. यामधील गांडूळखताचे प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. यामध्ये कृषी अधिकार्‍याचे व शेतकर्‍याचे सातत्य नसल्यामुळे सद्यस्थितीत सेंद्रीय शेती तालुक्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीला अधिकार्‍यांची उदासीनता कारणीभूत ठरत असली तरी काही शेतकर्‍यांच्या मते सेंद्रीय शेतीच्या मालाला जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे सेंद्रीय शेती करण्याचे शेतकरी टाळत असल्याचे दिसून येते.