शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

सेंद्रीय शेती हद्दपार !

By admin | Updated: May 28, 2014 23:36 IST

कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंगरूळपीर : अल्प खर्चात भरघोस उत्पन्न मिळावे आणि दर्जेदार उत्पादित पीक मिळावे या उदात्त हेतूने शासनाने मागील सहा वर्षापूर्वी शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीवर भर द्यावा या संदर्भात गावोगावी जनजागृती अभियान राबविले होते. मात्र अलीकडच्या काळात कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या अतोनात खर्चामुळे शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येचे कारण लक्षात घेऊन शासनाने जनजागृती अभियानाचा उपक्रम हाती घेवून गावोगावी जाऊन शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती फायदेशीर आहे याचे महत्व पटवून दिले. एवढेच नव्हे तर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक शेतकर्‍याने अल्प खर्चात भरघोस उत्पन्न देणार्‍या सेंद्रीय शेतीवर विशेष भर देण्यात आला होता. वारंवार रासायनिक व कीटकनाशकांचा वापर केल्याने जमिनीची पोत बिघडून जमीन बंजर होते. त्यामुळे सेंद्रीय शेतीचे अनेक फायदे लक्षात घेऊन तालुक्यातील गणेशपूर, पोटी, चांभई, कासोळा, तर्‍हाळा, येडशी, बेलखेड, मसोला, धोत्रा, घोटा, मंगळसा, वनोजा, खरबी या गावातील बहुतांश शेतकर्‍यांनी पुढाकार घेऊन सेंद्रीय शेती करण्याकडे कल वाढविला होता. यामध्ये विशेषत: कापूस, सोयाबीन, गहु, हरभरा आदी पीके सेंद्रीय पद्धतीने घेण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालिन जिल्हाधिकारी करवंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी गणेशपूर येथील शेतकर्‍यांनी सेंद्रीय पद्धतीने कापूस पीकविला होता. तेव्हा तेथील शेतकर्‍यांना बजारपेठेतील मूल्यापेक्षा ८00 रूपये जास्त दराने भाव मिळाला होता. सेंद्रीय शेतीला पुरक म्हणून अनेक गावामध्ये गांढूळ खत प्रकल्प देण्यात आले होते. यामधील गांडूळखताचे प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. यामध्ये कृषी अधिकार्‍याचे व शेतकर्‍याचे सातत्य नसल्यामुळे सद्यस्थितीत सेंद्रीय शेती तालुक्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीला अधिकार्‍यांची उदासीनता कारणीभूत ठरत असली तरी काही शेतकर्‍यांच्या मते सेंद्रीय शेतीच्या मालाला जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे सेंद्रीय शेती करण्याचे शेतकरी टाळत असल्याचे दिसून येते.