शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेती हद्दपार !

By admin | Updated: May 28, 2014 23:36 IST

कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंगरूळपीर : अल्प खर्चात भरघोस उत्पन्न मिळावे आणि दर्जेदार उत्पादित पीक मिळावे या उदात्त हेतूने शासनाने मागील सहा वर्षापूर्वी शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीवर भर द्यावा या संदर्भात गावोगावी जनजागृती अभियान राबविले होते. मात्र अलीकडच्या काळात कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या अतोनात खर्चामुळे शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येचे कारण लक्षात घेऊन शासनाने जनजागृती अभियानाचा उपक्रम हाती घेवून गावोगावी जाऊन शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती फायदेशीर आहे याचे महत्व पटवून दिले. एवढेच नव्हे तर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक शेतकर्‍याने अल्प खर्चात भरघोस उत्पन्न देणार्‍या सेंद्रीय शेतीवर विशेष भर देण्यात आला होता. वारंवार रासायनिक व कीटकनाशकांचा वापर केल्याने जमिनीची पोत बिघडून जमीन बंजर होते. त्यामुळे सेंद्रीय शेतीचे अनेक फायदे लक्षात घेऊन तालुक्यातील गणेशपूर, पोटी, चांभई, कासोळा, तर्‍हाळा, येडशी, बेलखेड, मसोला, धोत्रा, घोटा, मंगळसा, वनोजा, खरबी या गावातील बहुतांश शेतकर्‍यांनी पुढाकार घेऊन सेंद्रीय शेती करण्याकडे कल वाढविला होता. यामध्ये विशेषत: कापूस, सोयाबीन, गहु, हरभरा आदी पीके सेंद्रीय पद्धतीने घेण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालिन जिल्हाधिकारी करवंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी गणेशपूर येथील शेतकर्‍यांनी सेंद्रीय पद्धतीने कापूस पीकविला होता. तेव्हा तेथील शेतकर्‍यांना बजारपेठेतील मूल्यापेक्षा ८00 रूपये जास्त दराने भाव मिळाला होता. सेंद्रीय शेतीला पुरक म्हणून अनेक गावामध्ये गांढूळ खत प्रकल्प देण्यात आले होते. यामधील गांडूळखताचे प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. यामध्ये कृषी अधिकार्‍याचे व शेतकर्‍याचे सातत्य नसल्यामुळे सद्यस्थितीत सेंद्रीय शेती तालुक्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीला अधिकार्‍यांची उदासीनता कारणीभूत ठरत असली तरी काही शेतकर्‍यांच्या मते सेंद्रीय शेतीच्या मालाला जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे सेंद्रीय शेती करण्याचे शेतकरी टाळत असल्याचे दिसून येते.