शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:13 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केल्याचा आरोप त्यांनी प्रचारसभेत केल्याने भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात हजर झाले होते. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असे विधान राहुल गांधी यांनी भरसभेत केले होते. या प्रकरणावरूनच भिवंडी न्यायालयात राहुल गांधींविरोधात सुनावणी सुरू आहे. राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप नोंदवत संघाकडून भिवंडी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सोनाळे गावातील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा .स्व. संघावर टीका केल्याने, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात 6 मार्च 2014 रोजी याचिका दाखल केली होती. 

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का ? असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा वापर करत भाजपा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करु शकतं. भाजपाच्या आक्रमक धोरणामुळे काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRahul Gandhiराहुल गांधीbhiwandiभिवंडी