शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचं चाललंय काय? पंतप्रधानांना पाठवलेल्या 'त्या' पत्रावर मुख्यमंत्री ठाकरेंची स्वाक्षरीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:44 IST

मोदी सरकारवर सातत्यानं टीका करणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची पत्रावर स्वाक्षरीच नाही; १३ प्रमुख नेत्यांच्या पत्रावर सह्या

मुंबई: देशातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. देशात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल विरोधी पक्षातील नेत्यांची चिंता व्यक्त करणारं पत्र दोनच दिवसांपूर्वी मोदींना पाठवलं. या पत्रावर अनेक मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र मोदी सरकारला सातत्यानं टीका करणाऱ्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी नाही. त्यामुळे शिवसेना संभ्रमात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात धार्मिक विषयांवरून हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र यावर पंतप्रधानांनी मौन बाळगलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून सामाजिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, असं विरोधकांनी पत्रात नमूद केलं आहे. पंतप्रधान मोदींना १३ नेत्यांकडून संयुक्त पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भाकपचे महासचिव सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

मोदी सरकारवर सातत्यानं टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मात्र पंतप्रधान मोदींना विरोधकांकडून पाठवण्यात आलेल्या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. या संदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्याचं समजतं. मात्र त्यानंतरही ठाकरेंनी पत्रावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे ठाकरेंच्या स्वाक्षरीशिवाय मोदींना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर स्वाक्षरी केल्यास हिंदू मतं फुटतील अशी भीती शिवसेनेला वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी भाजपची सत्ता नसलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबईत बैठक घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. भाजपेतर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच मुंबईत भेट होऊ शकते, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जींनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रदेखील लिहिलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी