शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आत्मविश्वास आणि एकवाक्यता गमावलेला विरोधीपक्ष निष्प्रभ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2023 23:48 IST

अधिवेशनाचे वाजले सूप

मंगेश व्यवहारे, नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असताना विदर्भाचे प्रश्न मांडणे ही विरोधी बाकावरच्या सदस्यांचे कर्तव्य आहे.  मात्र आत्मविश्वास आणि एकावक्यता गमावलेला विरोधी पक्ष त्यात अपयशी ठरला. संसदीय कामकाज शिष्टाचारानुसार विदर्भावर चर्चेचा प्रस्ताव विरोधकांनाच ठेवावा लागतो. विरोधकांना यात शेवटच्या दिवसापर्यंत सपशेल अपयश आले. ते झाकण्यासाठी त्यांनी शेवटच्या दिवशी विदर्भावर चर्चेची मागणी करीत त्याचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडून विरोधकांनी सभात्याग केला, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात दिले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी सुप वाजले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे विधिमंडळ परिसरात पत्रपरिषद घेतली. यावेळी मुख्यंत्री शिंदे यांनी अधिवेशन काळात झालेल्या संसदीय कामकाजाचा आढावा घेतला.

अधिवेशन सुरू झाल्यापासून विदर्भाच्या मुद्यांवर चर्चा घडवून आणणे विरोधकांकडून अपेक्षित होते. तीच संसदीय कामकाजाचा शिष्टाचार आहे, असे नमूद करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांनी या अधिवेशनात पायऱ्यांवर उभे राहून सरकारवर टीका करण्याचेच काम केले. दुसरीकडे सत्तापक्षाने विदर्भ विकासाला प्राधान्य देत शेतकऱ्यांचे मुद्दे स्वतःहून चर्चेला घेतले. अवकाळी पाऊस, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींची भरीव मदत या सरकारने केली आहे. त्या पुढे जाऊन एकट्या विदर्भातील २९ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देत  ६ हजार कोटींचा भरघोस निधी दिला आहे. यापैकी फक्त गोसिखुर्दला १५०० कोटी रुपये सरकारने दिले आहेत. अधिवेशनात एकूण १० दिवसाच्या कामकाजात १७ विधेयके मांडण्यात आली असून त्यातील १२ मंजूर झाली आहेत. यात भ्रष्टाचार विरोधी कायद्यातले सर्वांत महत्त्वाचे लोकायुक्त विधेयक सरकारने मंजूर केले आहे. धानाला सरकारने गेल्या वर्षीच्या १५ हजार रुपयांवरून यंदा २० हजार रुपयांचा बोनस जाहिर केला आहे. कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान लक्षात घेता समृद्धी महामार्गावर २० कांदा महाबँक सरकार स्थापन करणार असून या माध्यमातून नाशवंत कांद्याला वाचविणे शक्य होईल.

सरकारला आरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव

मराठा आरक्षणावर दोन्ही सभागृहांमध्ये तीन दिवस साधक- बाधक चर्चा झाल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाच नव्हे तर सर्व घटकांना आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारला त्याची जाणीव आहे. घटनेच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागू देता मागासवर्ग आयोग आणि घटनेच्या जाणकारांची मदत घेऊन सरकाय युद्धपातळीवर काम करत आहे. आरक्षणाचा मुद्दा हा गुंतागुंतीचा असल्याने त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. भावनेच्या आहारी जाऊन तरुणांनी आत्मघाताचा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. येत्या महिन्याभरात मागासवर्ग आयोग आपला अहवाल देणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असा पुनुरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

सभागृहाचा एकही मिनीट वाया गेला नाही- उपमुख्यमंत्री फडणवीस

७ डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यंदा एकही मिनीट चर्चेविना वाया गेला असे घडले नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या अधिवेशनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन दिवस दर्शन घडू शकले. अंतिम आठवडा प्रस्ताव येई पर्यंत विरोधक विदर्भाच्या विकासासंदर्भात एकही प्रस्ताव आणू शकले नाहीत, हे देखील अधिवेशन काळात आजवर कधी घडले नव्हेत.

३३ वर्षांतले एतिहासिक अधिवेशन- उपमुख्यमंत्री पवार

माझ्या ३३ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारे घडलेले हे एतिहासिक अधिववेशन असल्याचे सांगत उपमुखअयमंत्री अजित पवार म्हणाले, संसदीय सल्लागार समितीने अधिवेशन लांबविण्याची सुचना केली असतील तर सरकार त्यासाठी तयार होते. मात्र अधिवेशन लांबावे ही विरोधकांचीच मानसिकता नव्हती. अधिवेशन काळात १०१ तास म्हणजे १५ दिवस क्लिअर ५ आठवडे कामकाज झाल्याचे सांगत ते म्हणाले, इथेनॉल,  दुध भूक्टी निर्याती संदर्भात केंद्रीय मंत्रालयाशी लवकरच चर्चा करून राज्यातील शेतकऱ्यांना आणखी मदत देण्याचे सरकारने प्राधान्याने ठरविले आहे. चर्चे विना एखादा प्रश्न राहीला असे देखील या अधिवेशनात घडले नाही, असेही पवार यांनी यावेळी विशेष नमूद केले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार