शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वास आणि एकवाक्यता गमावलेला विरोधीपक्ष निष्प्रभ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2023 23:48 IST

अधिवेशनाचे वाजले सूप

मंगेश व्यवहारे, नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असताना विदर्भाचे प्रश्न मांडणे ही विरोधी बाकावरच्या सदस्यांचे कर्तव्य आहे.  मात्र आत्मविश्वास आणि एकावक्यता गमावलेला विरोधी पक्ष त्यात अपयशी ठरला. संसदीय कामकाज शिष्टाचारानुसार विदर्भावर चर्चेचा प्रस्ताव विरोधकांनाच ठेवावा लागतो. विरोधकांना यात शेवटच्या दिवसापर्यंत सपशेल अपयश आले. ते झाकण्यासाठी त्यांनी शेवटच्या दिवशी विदर्भावर चर्चेची मागणी करीत त्याचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडून विरोधकांनी सभात्याग केला, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात दिले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी सुप वाजले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे विधिमंडळ परिसरात पत्रपरिषद घेतली. यावेळी मुख्यंत्री शिंदे यांनी अधिवेशन काळात झालेल्या संसदीय कामकाजाचा आढावा घेतला.

अधिवेशन सुरू झाल्यापासून विदर्भाच्या मुद्यांवर चर्चा घडवून आणणे विरोधकांकडून अपेक्षित होते. तीच संसदीय कामकाजाचा शिष्टाचार आहे, असे नमूद करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांनी या अधिवेशनात पायऱ्यांवर उभे राहून सरकारवर टीका करण्याचेच काम केले. दुसरीकडे सत्तापक्षाने विदर्भ विकासाला प्राधान्य देत शेतकऱ्यांचे मुद्दे स्वतःहून चर्चेला घेतले. अवकाळी पाऊस, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींची भरीव मदत या सरकारने केली आहे. त्या पुढे जाऊन एकट्या विदर्भातील २९ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देत  ६ हजार कोटींचा भरघोस निधी दिला आहे. यापैकी फक्त गोसिखुर्दला १५०० कोटी रुपये सरकारने दिले आहेत. अधिवेशनात एकूण १० दिवसाच्या कामकाजात १७ विधेयके मांडण्यात आली असून त्यातील १२ मंजूर झाली आहेत. यात भ्रष्टाचार विरोधी कायद्यातले सर्वांत महत्त्वाचे लोकायुक्त विधेयक सरकारने मंजूर केले आहे. धानाला सरकारने गेल्या वर्षीच्या १५ हजार रुपयांवरून यंदा २० हजार रुपयांचा बोनस जाहिर केला आहे. कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान लक्षात घेता समृद्धी महामार्गावर २० कांदा महाबँक सरकार स्थापन करणार असून या माध्यमातून नाशवंत कांद्याला वाचविणे शक्य होईल.

सरकारला आरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव

मराठा आरक्षणावर दोन्ही सभागृहांमध्ये तीन दिवस साधक- बाधक चर्चा झाल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाच नव्हे तर सर्व घटकांना आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारला त्याची जाणीव आहे. घटनेच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागू देता मागासवर्ग आयोग आणि घटनेच्या जाणकारांची मदत घेऊन सरकाय युद्धपातळीवर काम करत आहे. आरक्षणाचा मुद्दा हा गुंतागुंतीचा असल्याने त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. भावनेच्या आहारी जाऊन तरुणांनी आत्मघाताचा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. येत्या महिन्याभरात मागासवर्ग आयोग आपला अहवाल देणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असा पुनुरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

सभागृहाचा एकही मिनीट वाया गेला नाही- उपमुख्यमंत्री फडणवीस

७ डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यंदा एकही मिनीट चर्चेविना वाया गेला असे घडले नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या अधिवेशनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन दिवस दर्शन घडू शकले. अंतिम आठवडा प्रस्ताव येई पर्यंत विरोधक विदर्भाच्या विकासासंदर्भात एकही प्रस्ताव आणू शकले नाहीत, हे देखील अधिवेशन काळात आजवर कधी घडले नव्हेत.

३३ वर्षांतले एतिहासिक अधिवेशन- उपमुख्यमंत्री पवार

माझ्या ३३ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारे घडलेले हे एतिहासिक अधिववेशन असल्याचे सांगत उपमुखअयमंत्री अजित पवार म्हणाले, संसदीय सल्लागार समितीने अधिवेशन लांबविण्याची सुचना केली असतील तर सरकार त्यासाठी तयार होते. मात्र अधिवेशन लांबावे ही विरोधकांचीच मानसिकता नव्हती. अधिवेशन काळात १०१ तास म्हणजे १५ दिवस क्लिअर ५ आठवडे कामकाज झाल्याचे सांगत ते म्हणाले, इथेनॉल,  दुध भूक्टी निर्याती संदर्भात केंद्रीय मंत्रालयाशी लवकरच चर्चा करून राज्यातील शेतकऱ्यांना आणखी मदत देण्याचे सरकारने प्राधान्याने ठरविले आहे. चर्चे विना एखादा प्रश्न राहीला असे देखील या अधिवेशनात घडले नाही, असेही पवार यांनी यावेळी विशेष नमूद केले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार