शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिकाच्या प्रतिनिधींसमोर बुलेट ट्रेनला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:44 IST

जपानी अधिकाऱ्यांसमोर मांडली भूमिका

पालघर : प्रकल्पबाधित शेतकरी, आदिवासी, भूमिपुत्र व ग्रामस्थांचा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी होणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाला व या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे शेतकºयांनी जपानच्या जिकाच्या प्रतिनिधींना सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सर्वेक्षण आमची परवानगी नसताना मोठ्या पोलीस बंदोबस्तात दडपशाहीच्या मार्गाने केले जात असून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप ही बाधित शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाच्या समोर केला.बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन कंपनीचे प्रतिनिधी कात्सुओ मात्सुमोटो, केंगो अकमाई, मिहीर सोरटी यांनी पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पबाधित व गावकऱ्यांची २२ व २३ जानेवारी रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधीत तेथील वास्तव जाणून घेतले. या भेटीदरम्यान आढळून आलेल्या परिस्थिती संबंधीचा अहवाल ते जिका कंपनी तसेच भारत व जपान सरकारला सादर करणार असल्याची माहीती जिकाच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.जिका प्रतिनिधींनी बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित ग्रामस्थांशी वैयिक्तक संवाद साधत, प्रकल्पबाधिताचे म्हणणे जाणून घेतली. जिकाच्या प्रतिनिधींनी डहाणू तालुक्यातील कोटबी तसेच तलासरीतील धामणगाव आणि आमगावकरांची भेट घेतली व बुलेट ट्रेनबाबत त्यांची मते जाणून घेतली. दुसºया दिवशी हनुमाननगर, कल्लाळे येथील ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली.भाडेही न परवडणारेबुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी भारु डी गावातील जवळपास ६० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे महाग असल्याने तेवढी आमची ऐपत नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. बुलेट ट्रेनसाठी खर्च करण्यापेक्षा रेल्वे सुधारण्यासाठी, आरोग्य व शिक्षण यावर हा पैसा खर्च करावा अशी मागणीही यावेळी येथील भूमिपुत्रांनी केली.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनJapanजपानMumbaiमुंबईpalgharपालघर