शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

बच्चू कडूंचे 'ते' विधान अन् आसाम विधानसभेत गदारोळ; विरोधकांनी केली अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 11:47 IST

शुक्रवारी आसाम विधानसभेत राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे भाषण सुरु असताना कडू यांच्या विधानावरून विरोधकांनी गोंधळ घातला.

मुंबई - आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या एका विधानावरून आसाम विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना अटक करावी अशी मागणी आसाम विधानसभेत विरोधकांनी लावून धरली आहे. तर भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं सांगत बच्चू कडू यांनी या वादग्रस्त विधानावरून सारवासारव केली आहे. 

आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, राज्यातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात तुम्ही समिती गठित करण्यापेक्षा एखादा एक्शन प्लॅन तयार करा. जेवढे रस्त्यावर आहेत तेवढे उचला आणि आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये अशा कुत्र्यांना किंमत आहे. किमान ८-९ हजारांना विकले जातात. याबाबत माहिती घ्या. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा विचारले. जसं इथं बोकड खातात तसं तिकडे कुत्रे खातात. म्हणून तेथील व्यापारांना बोलावून तुम्ही चर्चा केली तर एका दिवसांत यावर तोडगा निघू शकतो. तिथल्या सरकारशी बोला असं कडू यांनी विधानसभेत सांगितले. 

आसामच्या विधानसभेत गदारोळशुक्रवारी आसाम विधानसभेत राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे भाषण सुरु असताना कडू यांच्या विधानावरून विरोधकांनी गोंधळ घातला. १५ मिनिटे भाषण थांबवायला लागले. त्यानंतर काँग्रेस आमदार कमलाख्या डे यांनी हा मुद्दा उचलला. आसामबाबत वादग्रस्त विधान करूनही सरकारनं मौन का बाळगले असा सवाल त्यांनी सभागृहात केला. आसामचे लोक कुत्र्याचे मटण खातात हे ते बोलले. हा भावनिक विषय आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. 

बच्चू कडू यांनी केली सारवासारवआसाम विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर आमदार बच्चू कडू यांनी या वादावर सारवासारव करत नागालँडमधील लोक कुत्रे खातात मला वाटलं आसाममधील खातात. ते दोन्ही राज्य जवळपास आहेत. ते चुकून आसाम बोललो, नागालँड बोलायला हवं होतं. हे चुकीने घडलं. त्यामुळे आसामच्या जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू