शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंचे 'ते' विधान अन् आसाम विधानसभेत गदारोळ; विरोधकांनी केली अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 11:47 IST

शुक्रवारी आसाम विधानसभेत राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे भाषण सुरु असताना कडू यांच्या विधानावरून विरोधकांनी गोंधळ घातला.

मुंबई - आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या एका विधानावरून आसाम विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना अटक करावी अशी मागणी आसाम विधानसभेत विरोधकांनी लावून धरली आहे. तर भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं सांगत बच्चू कडू यांनी या वादग्रस्त विधानावरून सारवासारव केली आहे. 

आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, राज्यातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात तुम्ही समिती गठित करण्यापेक्षा एखादा एक्शन प्लॅन तयार करा. जेवढे रस्त्यावर आहेत तेवढे उचला आणि आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये अशा कुत्र्यांना किंमत आहे. किमान ८-९ हजारांना विकले जातात. याबाबत माहिती घ्या. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा विचारले. जसं इथं बोकड खातात तसं तिकडे कुत्रे खातात. म्हणून तेथील व्यापारांना बोलावून तुम्ही चर्चा केली तर एका दिवसांत यावर तोडगा निघू शकतो. तिथल्या सरकारशी बोला असं कडू यांनी विधानसभेत सांगितले. 

आसामच्या विधानसभेत गदारोळशुक्रवारी आसाम विधानसभेत राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे भाषण सुरु असताना कडू यांच्या विधानावरून विरोधकांनी गोंधळ घातला. १५ मिनिटे भाषण थांबवायला लागले. त्यानंतर काँग्रेस आमदार कमलाख्या डे यांनी हा मुद्दा उचलला. आसामबाबत वादग्रस्त विधान करूनही सरकारनं मौन का बाळगले असा सवाल त्यांनी सभागृहात केला. आसामचे लोक कुत्र्याचे मटण खातात हे ते बोलले. हा भावनिक विषय आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. 

बच्चू कडू यांनी केली सारवासारवआसाम विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर आमदार बच्चू कडू यांनी या वादावर सारवासारव करत नागालँडमधील लोक कुत्रे खातात मला वाटलं आसाममधील खातात. ते दोन्ही राज्य जवळपास आहेत. ते चुकून आसाम बोललो, नागालँड बोलायला हवं होतं. हे चुकीने घडलं. त्यामुळे आसामच्या जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू