शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाणारच्या रिफायनरीला जनतेचा विरोधच - देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 04:59 IST

नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावास विरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

- विशेष प्रतिनिधी मुंबई - नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावासविरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्याने प्रकल्पासंबंधातील असहमती पत्रे मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली. नागरिकांशी बोलून शासन प्रकल्पाबाबत निर्णय घेईल. विरोध कायम असल्यास स्थानिक जनतेवर प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. परिणामी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत याबाबत सामंजस्य करार होऊ शकला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकल्पाबाबत निर्णय जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे देसाई यांनी निवेदनात सांगितले. देसाई यांच्या निवेदनादरम्यान राष्ट्रवादीचे भास्कर जाधव अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन बोलू देण्याची मागणी करू लागले. मात्र, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी ती अमान्य केली.स्वतंत्र चर्चाकरणार - मुख्यमंत्रीनाणारच्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिकाही उद्योगमंत्रीच सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका काय आहे? इतर सदस्यांनाही या विषयावर बोलायचे आहे. तेव्हा या विषयावर एक स्वतंत्र चर्चा चालू अधिवेशनात घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती मान्य केली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSubhash Desaiसुभाष देसाई