शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

विरोधकांना सावरकर यांच्याऐवजी कर्जमाफीचा मुद्दा घेता आला असता : बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 16:24 IST

विरोधीपक्षात अभ्यासू नेते आहेत. त्यांना शेतकरी प्रश्नी आवाज उंचावून लोकांची मने जिंकता आली असती. मात्र त्यांनी तसं केल नसून आम्हाला शेतकऱ्यांपेक्षा सावरकराचांच मुद्दा महत्त्वाचा असल्याचे विरोधकांनी दाखवून दिल्याचे कडू म्हणाले. 

मुंबई - नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वि.दा. सावरकर यांच्याविषयीच्या वक्तव्यामुळेच गाजला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांचे नाव घेत भाजपवर टीका केली होती. त्यामुळे विधीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपनेते आक्रमक झाले होते. मात्र आमदार बच्चू कडू यांनी यावरून विरोधीपक्षावर टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी प्रश्नांवर विरोधकांना आक्रमक होता आले असते, परंतु तसं झालं नसल्याचा टोला त्यांनी लगावला. 

विधीमंडळात शेतकरी कर्जमाफीसंदर्भात काहीही चर्चा झाली नाही. या संदर्भात भूमिका घेणे विरोधी पक्षाचे काम असते. विरोधक वीर सावरकरांच नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सावरकरांविषयीचं प्रेम महत्त्वाचं नसून यावरून राजकारण करता येतं का हे भाजपकडून पाहिले जात आहे. सावरकर यांच्यासारख्या महापुरषांचे नाव घेऊन भाजप राजकारण करेल, याची अपेक्षा केली नव्हती, असंही बच्चू कडू म्हणाले. 

मला आज दिवसभरात 100 मॅसेज आले आहेत. कर्जमाफी कधी मिळणार, आर्थिक मदतीचं काय झालं अशी विचारणा आपल्याला होत आहे. शेतकऱ्यांना या अधिवेशनाकडून आशा असते. त्यात विरोधकांनी भावनिक मुद्दे समोर आणल्याने शेतकऱ्यांना अडचण होते. सावरकरांचा मुद्दा शेवटच्या दोन दिवसांत घेता आला असता, अस कडू यांनी सांगितले. 

विरोधीपक्षात अभ्यासू नेते आहेत. त्यांना शेतकरी प्रश्नी आवाज उंचावून लोकांची मने जिंकता आली असती. मात्र त्यांनी तसं केल नसून आम्हाला शेतकऱ्यांपेक्षा सावरकराचांच मुद्दा महत्त्वाचं असल्याचे विरोधकांनी दाखवून दिल्याचे कडू म्हणाले. 

दरम्यान कर्जमाफी हा मुद्दा तातडीचा नाही. कर्जमाफी व्यवस्थीत हातळण्याचा विषय आहे. कर्जमाफी ही केवळ मलपट्टी आहे. त्याची शस्त्रक्रिया आवश्यक आहे. त्यातून शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, असंही मत कडू यांनी मांडले. तसेच कर्जमाफीसाठी एक महिना तरी लागले, असंही त्यांनी सांगितले.