शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शाळा सुरू झाल्यावर एका बाकावर एकच विद्यार्थी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 04:04 IST

मार्गदर्शक सूचना जाहीर; स्वयं अध्ययनाची गोडी लावण्याचा प्रयत्न

मुंबई : शिक्षण विभागाकडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना प्रस्तावित मार्गदर्शक सूचनाना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर एका बाकावर एक विद्यार्थी म्हणजे वर्गात जास्तीत जास्त ३० विद्यार्थी, ३ तासांचे एक सत्र , सम-विषम पद्धतीने शाळांमध्ये बोलावणे अशा पद्धतींचा वापर करण्याच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन , ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांनी घ्यायचा आहे. तसेच नवीन प्रवेशप्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने शाळेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने घ्यायची आहे. विशेष म्हणजे भविष्यामध्ये टीव्ही, रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करून शिक्षण देण्यात येणार असल्याने याचा वापर मुलांनी करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.जुलैमध्ये सुरुवातीला नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असून, आॅगस्टमध्ये सहावी ते आठवी, सप्टेंबरमध्ये तिसरी ते पाचवी वर्ग सुरू करता येणार आहेत. कन्टेन्मेन्ट झोनमधील शाळा सुरू करण्याची कोणतीही निश्चित तारीख ठरविता येणार नाही.शाळा व्यवस्थापन समिती व तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कन्टेन्मेन्ट झोनमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळांना घेता येणार आहे. मुलांनी स्वयंअध्ययन करावे आणि शिक्षकानी त्यांच्या प्रश्नांचे निरसन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.शाळांसाठी अटी, शर्तीशाळा २ सत्रांमध्ये सुरू करता येणार.एक सत्र जास्तीत जास्त ३ तासाचे किंवा वेगवेगळ््या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून शाळेत यावे (सम-विषम पद्धती)दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान१ मीटर अंतर असावे.विद्यार्थी शाळेत येताना/जातानाची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे.प्रत्यक्षात शाळा सुरू होईपर्यंत पोषण आहार घरपोच पोहचणे आवश्यकविषयनिहाय पुस्तकेदेण्याची व्यवस्था करावी.आॅनलाईन लर्निंगचे नियोजन करावे.दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती नाहीदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या उर्वरित पेपरला बसण्यासाठी जबरदस्ती करणार नाही, अशी माहिती इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (आयएससीई) उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात प्रलंबित असलेल्या परीक्षेला बसण्याची इच्छा नसेल तर त्यांना अंतर्गत परीक्षा किंवा पूर्व परीक्षेतील कामगिरीच्या आधारे अंतिम निकाल देण्यात येईल, असे मंडळाने उच्च न्यायालयाला सांगितले. २२ जूनपर्यंत शाळांनी पर्याय मंडळाला पाठवणे बंधनकारक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा