शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 2:47 PM

देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला

मुंबई : देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना फडणवीसांनी डाव्या संघटनांना आणि कॉंग्रेसला चिमटे काढले.  मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस बोलत होते. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना त्यांनी देशातून डावे हद्दपार झाले आहेत. ते केवळ नावालाच उरले आहेत. आता पूर्वेकडील राज्यातही लाल सूर्य मावळला असल्याची टीका त्यांनी केली. तसंच, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत असा टोला फडणवीसांनी लगावला. 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे, त्यांनी भाजपवर विश्वास दाखविल्यानेच आम्ही ही मजल मारू शकलो' असं फडणवीस म्हणाले. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचं संघटन कौशल्य यामुळेच हा विजय संपादन झाल्याचं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. यावेळी बोलताना फडणवीसांनी, हा विजय केवळ ट्रेलर आहे,  पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. कर्नाटकात आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच बहुमताने सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. पूर्वेकडील राज्यात भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या सुनील देवधर यांचंही फडणवीस यांनी कौतुक केलं. देवधर यांनी दोन वर्ष त्रिपुरात संघर्ष केला. त्याचंच हे फळ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो- मुख्यमंत्री आज पार पडलेल्या नदी संवर्धन संकल्प कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेले नाहीत.  त्यावर प्रतिक्रिया देताना, मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. 

  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस