शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फक्त लाट असेल तरच मिळतात भरभरून मते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:20 IST

गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली.

-प्रेमदास राठोडगेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली. उर्वरित ३५१ खासदारांना ५० टक्क्यांहून कमी मतांवर समाधान मानावे लागले. १९७७ पासून एकूण ११ सार्वत्रिक निवडणुकांमधील प्राप्त मतांवर नजर फिरवली असता लाट असेल तरच विजयी उमेदवाराला भरभरून मते मिळतात. नाहीतर अनेक खासदारांना ५० टक्के मतेही मिळत नाहीत.१९७७ पासूनच्या ११ निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ५२८ पैकी २६० जणांना ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली तर २६८ खासदारांना त्यापेक्षा कमी मते पडली. १९७७ च्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची लाट (१० पैकी ८ जागा काँग्रेस) तर उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेसविरोधी लाट होती. त्यावेळी ४८ पैकी तब्बल ४२ खासदारांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे १८, भालोदचे १७, माकप व शेकापचे प्रत्येकी ३ आणि खोरिपच्या एकाचा समावेश होता. फक्त नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जळगाव व कोल्हापूर या ६ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्क््याहून कमी मते पडली होती.१९८० च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट होती. त्यावेळी ४८ पैकी ४० खासदारांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यातील तब्बल ३४ खासदार एकट्या काँग्रेसचे होते. ठाणे, खेड, कुलाबा, बारामती, जळगाव आणि मुंबईतील ३ अशा फक्त ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून कमी मते मिळाली होती. इंदिरा गांधी हत्येनंतरच्या निवडणुकीत १९८४ मध्येही काँग्रेसची लाट होती. त्या वेळी ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे ३० आणि समाजवादी काँग्रेसच्या दोघांचा समावेश होता.१९७७ ते १९८४ लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये लाट अनुभवलेल्या महाराष्ट्रात नंतरच्या तीन निवडणुकांत कोणतीही लाट नव्हती. १९८९ मध्ये फक्त २१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली होती. १९९१ मध्ये ही संख्या २० पर्यंत खाली आली. १९९६ मध्ये तर अवघ्या ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून जास्त मते पडली. रत्नागिरी, मुंबई उत्तर, बारामती, जालना, जळगाव, ठाणे, सांगली व पुणे वगळता इतर ४० ठिकाणच्या विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून कमी मते पडली होती. त्या वेळच्या अस्थिर परिस्थितीमुळे १९९८ मध्ये मध्यावधी झाल्या, त्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट बघावयास मिळाली. त्या वेळी ३१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली, त्यात एकट्या काँग्रेसचे २५ जण होते. पुन्हा तीन निवडणुकांमध्ये (१९९९, २००४ व २००९) कोणतीही लाट नव्हती. त्यामुळे या निवडणुकांत १५ पेक्षा जास्त लोकांना ५० टक्क्यांचा कौल मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात मोदी लाट होती. त्या वेळी पुन्हा एकदा ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान