शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

फक्त लाट असेल तरच मिळतात भरभरून मते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:20 IST

गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली.

-प्रेमदास राठोडगेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली. उर्वरित ३५१ खासदारांना ५० टक्क्यांहून कमी मतांवर समाधान मानावे लागले. १९७७ पासून एकूण ११ सार्वत्रिक निवडणुकांमधील प्राप्त मतांवर नजर फिरवली असता लाट असेल तरच विजयी उमेदवाराला भरभरून मते मिळतात. नाहीतर अनेक खासदारांना ५० टक्के मतेही मिळत नाहीत.१९७७ पासूनच्या ११ निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ५२८ पैकी २६० जणांना ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली तर २६८ खासदारांना त्यापेक्षा कमी मते पडली. १९७७ च्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची लाट (१० पैकी ८ जागा काँग्रेस) तर उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेसविरोधी लाट होती. त्यावेळी ४८ पैकी तब्बल ४२ खासदारांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे १८, भालोदचे १७, माकप व शेकापचे प्रत्येकी ३ आणि खोरिपच्या एकाचा समावेश होता. फक्त नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जळगाव व कोल्हापूर या ६ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्क््याहून कमी मते पडली होती.१९८० च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट होती. त्यावेळी ४८ पैकी ४० खासदारांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यातील तब्बल ३४ खासदार एकट्या काँग्रेसचे होते. ठाणे, खेड, कुलाबा, बारामती, जळगाव आणि मुंबईतील ३ अशा फक्त ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून कमी मते मिळाली होती. इंदिरा गांधी हत्येनंतरच्या निवडणुकीत १९८४ मध्येही काँग्रेसची लाट होती. त्या वेळी ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे ३० आणि समाजवादी काँग्रेसच्या दोघांचा समावेश होता.१९७७ ते १९८४ लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये लाट अनुभवलेल्या महाराष्ट्रात नंतरच्या तीन निवडणुकांत कोणतीही लाट नव्हती. १९८९ मध्ये फक्त २१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली होती. १९९१ मध्ये ही संख्या २० पर्यंत खाली आली. १९९६ मध्ये तर अवघ्या ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून जास्त मते पडली. रत्नागिरी, मुंबई उत्तर, बारामती, जालना, जळगाव, ठाणे, सांगली व पुणे वगळता इतर ४० ठिकाणच्या विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून कमी मते पडली होती. त्या वेळच्या अस्थिर परिस्थितीमुळे १९९८ मध्ये मध्यावधी झाल्या, त्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट बघावयास मिळाली. त्या वेळी ३१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली, त्यात एकट्या काँग्रेसचे २५ जण होते. पुन्हा तीन निवडणुकांमध्ये (१९९९, २००४ व २००९) कोणतीही लाट नव्हती. त्यामुळे या निवडणुकांत १५ पेक्षा जास्त लोकांना ५० टक्क्यांचा कौल मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात मोदी लाट होती. त्या वेळी पुन्हा एकदा ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान