शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

फक्त लाट असेल तरच मिळतात भरभरून मते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:20 IST

गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली.

-प्रेमदास राठोडगेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली. उर्वरित ३५१ खासदारांना ५० टक्क्यांहून कमी मतांवर समाधान मानावे लागले. १९७७ पासून एकूण ११ सार्वत्रिक निवडणुकांमधील प्राप्त मतांवर नजर फिरवली असता लाट असेल तरच विजयी उमेदवाराला भरभरून मते मिळतात. नाहीतर अनेक खासदारांना ५० टक्के मतेही मिळत नाहीत.१९७७ पासूनच्या ११ निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ५२८ पैकी २६० जणांना ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली तर २६८ खासदारांना त्यापेक्षा कमी मते पडली. १९७७ च्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची लाट (१० पैकी ८ जागा काँग्रेस) तर उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेसविरोधी लाट होती. त्यावेळी ४८ पैकी तब्बल ४२ खासदारांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे १८, भालोदचे १७, माकप व शेकापचे प्रत्येकी ३ आणि खोरिपच्या एकाचा समावेश होता. फक्त नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जळगाव व कोल्हापूर या ६ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्क््याहून कमी मते पडली होती.१९८० च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट होती. त्यावेळी ४८ पैकी ४० खासदारांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यातील तब्बल ३४ खासदार एकट्या काँग्रेसचे होते. ठाणे, खेड, कुलाबा, बारामती, जळगाव आणि मुंबईतील ३ अशा फक्त ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून कमी मते मिळाली होती. इंदिरा गांधी हत्येनंतरच्या निवडणुकीत १९८४ मध्येही काँग्रेसची लाट होती. त्या वेळी ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे ३० आणि समाजवादी काँग्रेसच्या दोघांचा समावेश होता.१९७७ ते १९८४ लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये लाट अनुभवलेल्या महाराष्ट्रात नंतरच्या तीन निवडणुकांत कोणतीही लाट नव्हती. १९८९ मध्ये फक्त २१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली होती. १९९१ मध्ये ही संख्या २० पर्यंत खाली आली. १९९६ मध्ये तर अवघ्या ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून जास्त मते पडली. रत्नागिरी, मुंबई उत्तर, बारामती, जालना, जळगाव, ठाणे, सांगली व पुणे वगळता इतर ४० ठिकाणच्या विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून कमी मते पडली होती. त्या वेळच्या अस्थिर परिस्थितीमुळे १९९८ मध्ये मध्यावधी झाल्या, त्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट बघावयास मिळाली. त्या वेळी ३१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली, त्यात एकट्या काँग्रेसचे २५ जण होते. पुन्हा तीन निवडणुकांमध्ये (१९९९, २००४ व २००९) कोणतीही लाट नव्हती. त्यामुळे या निवडणुकांत १५ पेक्षा जास्त लोकांना ५० टक्क्यांचा कौल मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात मोदी लाट होती. त्या वेळी पुन्हा एकदा ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान