शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातबारावर नाव असेल तरच मिळणार विमा, ग्राहक मंचचा निर्णय, कंपनीविरुद्धची तक्रार फेटाळून लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:59 IST

शेतकरी अपघात विमा लागू झाल्याच्या तारखेला सातबारा उताºयावर नाव असेल तरच, शेतक-यांच्या कुटुंबीयांना त्याच्या अपघाती निधनानंतर विम्याचा लाभ मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे.

- राकेश घानोडेनागपूर : शेतकरी अपघात विमा लागू झाल्याच्या तारखेला सातबारा उताºयावर नाव असेल तरच, शेतक-यांच्या कुटुंबीयांना त्याच्या अपघाती निधनानंतर विम्याचा लाभ मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्य चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला आहे. राज्य शासनाने १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीसाठी राज्यातील नोंदणीकृत शेतकºयांना अपघातापासून संरक्षण देण्यासाठी विमा काढला होता. त्या विम्याचा लाभ १ नोव्हेंबर २०१४ रोजी सातबारा उताºयावर नावाची नोंद असलेल्या शेतकºयांनाच दिला जाऊ शकतो. त्यानंतर सातबारा उताºयावर नाव नोंदविले गेले असल्यास शेतकºयांना विम्याचा लाभ मिळू शकत नाही, असे मंचने निर्णयात म्हटले आहे.या प्रकरणात दिला निवाडाकुही तालुक्यातील धानोली येथील शेतकरी रणजित गोडे यांचे २१ जुलै २०१५ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकरी अपघात विम्याचे एक लाख रुपये मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सादर केलेला दावा टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीने नामंजूर केला. त्यामुळे मयताची पत्नी सीमा व वडील ताराचंद यांनी मंचात तक्रार दाखल केली होती. परंतु, १ नोव्हेंबर २०१४ रोजी सातबारा उताºयावर रणजितचे नाव नसल्यामुळे मंचने त्यांची तक्रार खारीज केली. विम्याचा लाभ मिळण्यासाठी १ नोव्हेंबर २०१४ रोजी सातबारा उताºयावर शेतकºयाच्या नावाचा समावेश असणे ही योजनेची प्राथमिक अट असल्याचे मंचने स्पष्ट केले. रणजित यांच्या नावाची १६ एप्रिल २०१५ रोजी सातबारा उताºयावर नोंद झाली होती. त्यावेळी विमा वैध होता, पण त्याचा लाभ रणजित यांच्या कुटुंबीयांना मिळू शकला नाही.मंचचे महत्त्वाचे निरीक्षणविमा योजनेअंतर्गत केवळ त्याच शेतकºयाला विमा संरक्षण मिळू शकते, ज्याचे नाव शेतकरी म्हणून शासकीय अभिलेखात नोंदणीकृत होते. कारण त्याच शेतकºयाचा विमा हप्ता शासनाने संबंधित विमा कंपनीत भरला होता.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर