शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सातबारावर नाव असेल तरच मिळणार विमा, ग्राहक मंचचा निर्णय, कंपनीविरुद्धची तक्रार फेटाळून लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:59 IST

शेतकरी अपघात विमा लागू झाल्याच्या तारखेला सातबारा उताºयावर नाव असेल तरच, शेतक-यांच्या कुटुंबीयांना त्याच्या अपघाती निधनानंतर विम्याचा लाभ मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे.

- राकेश घानोडेनागपूर : शेतकरी अपघात विमा लागू झाल्याच्या तारखेला सातबारा उताºयावर नाव असेल तरच, शेतक-यांच्या कुटुंबीयांना त्याच्या अपघाती निधनानंतर विम्याचा लाभ मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्य चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला आहे. राज्य शासनाने १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीसाठी राज्यातील नोंदणीकृत शेतकºयांना अपघातापासून संरक्षण देण्यासाठी विमा काढला होता. त्या विम्याचा लाभ १ नोव्हेंबर २०१४ रोजी सातबारा उताºयावर नावाची नोंद असलेल्या शेतकºयांनाच दिला जाऊ शकतो. त्यानंतर सातबारा उताºयावर नाव नोंदविले गेले असल्यास शेतकºयांना विम्याचा लाभ मिळू शकत नाही, असे मंचने निर्णयात म्हटले आहे.या प्रकरणात दिला निवाडाकुही तालुक्यातील धानोली येथील शेतकरी रणजित गोडे यांचे २१ जुलै २०१५ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकरी अपघात विम्याचे एक लाख रुपये मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सादर केलेला दावा टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीने नामंजूर केला. त्यामुळे मयताची पत्नी सीमा व वडील ताराचंद यांनी मंचात तक्रार दाखल केली होती. परंतु, १ नोव्हेंबर २०१४ रोजी सातबारा उताºयावर रणजितचे नाव नसल्यामुळे मंचने त्यांची तक्रार खारीज केली. विम्याचा लाभ मिळण्यासाठी १ नोव्हेंबर २०१४ रोजी सातबारा उताºयावर शेतकºयाच्या नावाचा समावेश असणे ही योजनेची प्राथमिक अट असल्याचे मंचने स्पष्ट केले. रणजित यांच्या नावाची १६ एप्रिल २०१५ रोजी सातबारा उताºयावर नोंद झाली होती. त्यावेळी विमा वैध होता, पण त्याचा लाभ रणजित यांच्या कुटुंबीयांना मिळू शकला नाही.मंचचे महत्त्वाचे निरीक्षणविमा योजनेअंतर्गत केवळ त्याच शेतकºयाला विमा संरक्षण मिळू शकते, ज्याचे नाव शेतकरी म्हणून शासकीय अभिलेखात नोंदणीकृत होते. कारण त्याच शेतकºयाचा विमा हप्ता शासनाने संबंधित विमा कंपनीत भरला होता.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर