शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

'फडणवीस सरकारच्या काळात केवळ आश्वासनांचा पूर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:16 IST

फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात मंत्र्यांनी केवळ आश्वासने दिले असून आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याकडे आपण लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. 

मुंबई - राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार आपल्या पहिल्या अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. विरोधक आक्रमक असून विरोधात बसलेला भारतीय जनता पक्ष सत्ताधाऱ्यांना अधिवेशन काळात सळो की पळो करून सोडणार अस दिसत आहे. मात्र त्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या सत्तेच्या काळातील कारभारावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विधीमंडळातील मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या. या घोषणा दिल्यानंतर अंमलबजावणीच्या बाबतीत बोंब होती, अस पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले विधानसभेचे नवे अध्यक्ष असून या संदर्भात आपण सचिवांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधीमंडळात मंत्री जबाबदारीने बोलत असतात. येथे त्यांनी दिलेली आश्वासने पाळली जातील असे संकेत असतात. या आश्वासनाचा पाठपुरावा करून अंमलबजावणी सचिवांनी करायला हवी असते. मात्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात मंत्र्यांनी केवळ आश्वासने दिले असून आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याकडे आपण लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.