शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

कोरड पडलेल्या १५ पैकी ८ गावांनाच पाणी

By admin | Updated: April 3, 2017 03:52 IST

मार्च महिना संपला आणि जव्हार तालुक्यातील तब्बल पंधरा गावांच्या घशाला कोरड पडल्याची आकडेवारी समोर आली

हुसेन मेमन,जव्हार- मार्च महिना संपला आणि जव्हार तालुक्यातील तब्बल पंधरा गावांच्या घशाला कोरड पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यातील सात गावांना तीन टॅँकरच्या सहाय्याने एक दिवसा आड पुरवठा सुरु करण्यात आला असून आठ गावांची मागणी जव्हार पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे अद्याप विचाराधीन आहे. तालुक्यातील पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जनीजव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्यामुळे पुढील एप्रिल व मे महिना कसा घालवायचा असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. ज्या गावांना पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्या गावातील विहिरींंनी तळ गाठला आहे. त्यातच जव्हार पंचायत समितीकडे तीन टँकर असल्याने दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. जव्हार पंचायत समितीकडे आठ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. खरंबा, कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे यांचा त्यामध्ये समावेश आहे.गुरढोरे नदीकाठच्या माळरानावरजव्हारच्या ज्या गावांना पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्या गावातील गुरांंचे करायचे काय असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. गुरे व जनावरांना पाणी पिण्यासाठी अधिक लागत असल्याने घरातील जनावरे गाई, बैल, म्हशी घरातुन नदीकाठी सोडले आहेत.वाद नको म्हणून असा तोडगादिवसाआड टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी वाद देखील निर्माण होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टँकर विहिरीत सोडण्यात येत आहे.>बालशेतपाडा गाव तहानेने व्याकूळवाडा: तालुक्यातील बालशेतपाडा या जवळपास तीनशेची लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामस्थ तहानेने व्याकुळ झाले असून पाणीपुरवठा योजना ठेकेदाराने घशात घातल्याने पाण्यासाठी २ किलोमीटरची पायपीट लोकांना करावी लागत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. शहरापासून नजीकच असणाऱ्या बालशेतपाडा गावात सध्या प्रचंड पाणीबाणी सुरु आहे. या गावासाठी मांडावा-बालशेतपाडा या नावे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. ज्यासाठी गारगाई नदीतून पाणी आणण्याचे नियोजन होते. मात्र, या योजनेचे पाणी लोकांना प्यायला मिळालेच नाही असे, बालशेतपाडा वासीयांचे म्हणणे आहे. गावात विहिरी व बोअरवेल आहेत. आता या स्त्रोतांना पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसल्याने पाण्यासाठी लोकांना गवळीपाडा किंवा मांडावा या ठिकाणी तब्बल २ किमी पायपीट करावी लागते. ही बहुतांश गाव आदिवासी लोकवस्तीचा असल्याने लोकांना पाण्यासाठी मजुरीला जाणे जमत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबावर एक वेळच्या जवणाची वेळ आली आहे. पाण्यासाठी वृद्ध, महिला, लहान मुले, विद्यार्थी अशा सर्वांनाच डोक्यावर हंडा घ्यावा लागतो असे चित्र आहे. योजनेबाबत विचारले असता ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्याने तिची माहिती ग्रामपंचायतीकडे असावी अशी उडवाउडवी करण्यात आली. त्यामुळे आता गावातील आटलेल्या विहिरींमध्ये पंचायत समिती विभागाने टँकर द्वारे किमान पिण्यापुरते पाणी तरी टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या ठेकेदारांनी चालविलेल्या या अमानुष उद्योगांना कुणीतरी आवर घालावी अशी मागणी केली जात आहे.