शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

कोरड पडलेल्या १५ पैकी ८ गावांनाच पाणी

By admin | Updated: April 3, 2017 03:52 IST

मार्च महिना संपला आणि जव्हार तालुक्यातील तब्बल पंधरा गावांच्या घशाला कोरड पडल्याची आकडेवारी समोर आली

हुसेन मेमन,जव्हार- मार्च महिना संपला आणि जव्हार तालुक्यातील तब्बल पंधरा गावांच्या घशाला कोरड पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यातील सात गावांना तीन टॅँकरच्या सहाय्याने एक दिवसा आड पुरवठा सुरु करण्यात आला असून आठ गावांची मागणी जव्हार पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे अद्याप विचाराधीन आहे. तालुक्यातील पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जनीजव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्यामुळे पुढील एप्रिल व मे महिना कसा घालवायचा असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. ज्या गावांना पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्या गावातील विहिरींंनी तळ गाठला आहे. त्यातच जव्हार पंचायत समितीकडे तीन टँकर असल्याने दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. जव्हार पंचायत समितीकडे आठ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. खरंबा, कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे यांचा त्यामध्ये समावेश आहे.गुरढोरे नदीकाठच्या माळरानावरजव्हारच्या ज्या गावांना पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्या गावातील गुरांंचे करायचे काय असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. गुरे व जनावरांना पाणी पिण्यासाठी अधिक लागत असल्याने घरातील जनावरे गाई, बैल, म्हशी घरातुन नदीकाठी सोडले आहेत.वाद नको म्हणून असा तोडगादिवसाआड टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी वाद देखील निर्माण होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टँकर विहिरीत सोडण्यात येत आहे.>बालशेतपाडा गाव तहानेने व्याकूळवाडा: तालुक्यातील बालशेतपाडा या जवळपास तीनशेची लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामस्थ तहानेने व्याकुळ झाले असून पाणीपुरवठा योजना ठेकेदाराने घशात घातल्याने पाण्यासाठी २ किलोमीटरची पायपीट लोकांना करावी लागत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. शहरापासून नजीकच असणाऱ्या बालशेतपाडा गावात सध्या प्रचंड पाणीबाणी सुरु आहे. या गावासाठी मांडावा-बालशेतपाडा या नावे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. ज्यासाठी गारगाई नदीतून पाणी आणण्याचे नियोजन होते. मात्र, या योजनेचे पाणी लोकांना प्यायला मिळालेच नाही असे, बालशेतपाडा वासीयांचे म्हणणे आहे. गावात विहिरी व बोअरवेल आहेत. आता या स्त्रोतांना पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसल्याने पाण्यासाठी लोकांना गवळीपाडा किंवा मांडावा या ठिकाणी तब्बल २ किमी पायपीट करावी लागते. ही बहुतांश गाव आदिवासी लोकवस्तीचा असल्याने लोकांना पाण्यासाठी मजुरीला जाणे जमत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबावर एक वेळच्या जवणाची वेळ आली आहे. पाण्यासाठी वृद्ध, महिला, लहान मुले, विद्यार्थी अशा सर्वांनाच डोक्यावर हंडा घ्यावा लागतो असे चित्र आहे. योजनेबाबत विचारले असता ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्याने तिची माहिती ग्रामपंचायतीकडे असावी अशी उडवाउडवी करण्यात आली. त्यामुळे आता गावातील आटलेल्या विहिरींमध्ये पंचायत समिती विभागाने टँकर द्वारे किमान पिण्यापुरते पाणी तरी टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या ठेकेदारांनी चालविलेल्या या अमानुष उद्योगांना कुणीतरी आवर घालावी अशी मागणी केली जात आहे.