शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 500 रुपयांसाठी केला खून, गुन्हा अडीच महिन्यांनी उघडकीस

By admin | Updated: August 20, 2016 19:53 IST

उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने ठाण्यात एका इसमाचा खून करण्यात आला, मात्र तब्बल अडीच महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला.

जितेंद्र कालेकर
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २० - उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने ठाण्यात एका इसमाचा खून करण्यात आला, मात्र तब्बल अडीच महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला.  उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने कृपाशंकर रामसागर पाठक (24, रा. कळवा, मुळ रा. उत्तरप्रदेश) या फिरस्त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून खून करणा:या लंबू उर्फ रप्पल उर्फ स्वामीदयाल जयकरण वर्मा याला उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून ठाण गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याला 24 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. 
   कळव्याच्या ठाकूर पाडयात बिगारी काम करणारा फिरस्ता कृपाशंकर याचा खून केल्याची घटना 26 मे 2016 रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक समांतर तपास करीत होते. एक कोटींच्या खंडणीप्रकरणी खालीद कादरी (49) या मुंब्य्रातील इस्टेट एजंटचे अपहरण केल्यानंतर त्याची ठाणो गुन्हे अन्वेषण विभाग युनिट 1 आणिि मुंब्रा पोलिसांच्या पथकाने थेट पाटणा येथून सुटका करुन तिघा खंडणीबहाद्दरांना अटक केली. त्यानंतर खलिद आणि खंडणीबहाद्दर नूर आलम यांचा मोबाईल शोधण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचे पथक नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील चंपारण्य जिल्ह्यात गेले होते. त्यांनी दंडक नदीच्या पाटातून दोन मोबाईलही हस्तगत केले.
16 ऑगस्ट रोजी बिहार ते गोरखपूर येथे हे पथक आले. गोरखपूर ते मुंबईसाठी रेल्वेने येतांना रस्त्यातच झाशी स्थानकाजवळ आल्यानंतर पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना कृपाशंकरचा मारेकरी लंबू वर्मा हा गाेंडा जिल्ह्यात  येत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागूल आणि हवालदार भिलारे हे दोघे झाशीमध्ये उतरले. त्यांनी गौडा जिल्हयातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने वर्माचा शोध घेतला. तो त्याच्या मेव्हण्याच्या अंदूपूर, शिसपूर गावातील  मिळाला. त्याच्याकडे कळव्यातील कृपाशंकरच्या खूनाची कसून चौकशी करण्यात आली. कृपाशंकरने पाच वेळा प्रत्येकी शंभर रुपये असे पाचशे रुपये घेतले होते. ते परत मागितल्यानंतर त्याने शिवीगाळी केली. याच कारणावरुन 26 मे रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास तो कळव्याच्या ठाकूरपाडा येथील कालीका मंदीराजवळ झोपलेला असतांना त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार केले. त्यातच त्याचा मृत्यु झाल्याची कबूलीही त्याने दिली. त्याला 17 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. ठाणो न्यायालयात शुक्रवारी हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी कळवा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)