शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अवघ्या 500 रुपयांसाठी केला खून, गुन्हा अडीच महिन्यांनी उघडकीस

By admin | Updated: August 20, 2016 19:53 IST

उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने ठाण्यात एका इसमाचा खून करण्यात आला, मात्र तब्बल अडीच महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला.

जितेंद्र कालेकर
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २० - उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने ठाण्यात एका इसमाचा खून करण्यात आला, मात्र तब्बल अडीच महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला.  उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने कृपाशंकर रामसागर पाठक (24, रा. कळवा, मुळ रा. उत्तरप्रदेश) या फिरस्त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून खून करणा:या लंबू उर्फ रप्पल उर्फ स्वामीदयाल जयकरण वर्मा याला उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून ठाण गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याला 24 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. 
   कळव्याच्या ठाकूर पाडयात बिगारी काम करणारा फिरस्ता कृपाशंकर याचा खून केल्याची घटना 26 मे 2016 रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक समांतर तपास करीत होते. एक कोटींच्या खंडणीप्रकरणी खालीद कादरी (49) या मुंब्य्रातील इस्टेट एजंटचे अपहरण केल्यानंतर त्याची ठाणो गुन्हे अन्वेषण विभाग युनिट 1 आणिि मुंब्रा पोलिसांच्या पथकाने थेट पाटणा येथून सुटका करुन तिघा खंडणीबहाद्दरांना अटक केली. त्यानंतर खलिद आणि खंडणीबहाद्दर नूर आलम यांचा मोबाईल शोधण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचे पथक नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील चंपारण्य जिल्ह्यात गेले होते. त्यांनी दंडक नदीच्या पाटातून दोन मोबाईलही हस्तगत केले.
16 ऑगस्ट रोजी बिहार ते गोरखपूर येथे हे पथक आले. गोरखपूर ते मुंबईसाठी रेल्वेने येतांना रस्त्यातच झाशी स्थानकाजवळ आल्यानंतर पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना कृपाशंकरचा मारेकरी लंबू वर्मा हा गाेंडा जिल्ह्यात  येत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागूल आणि हवालदार भिलारे हे दोघे झाशीमध्ये उतरले. त्यांनी गौडा जिल्हयातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने वर्माचा शोध घेतला. तो त्याच्या मेव्हण्याच्या अंदूपूर, शिसपूर गावातील  मिळाला. त्याच्याकडे कळव्यातील कृपाशंकरच्या खूनाची कसून चौकशी करण्यात आली. कृपाशंकरने पाच वेळा प्रत्येकी शंभर रुपये असे पाचशे रुपये घेतले होते. ते परत मागितल्यानंतर त्याने शिवीगाळी केली. याच कारणावरुन 26 मे रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास तो कळव्याच्या ठाकूरपाडा येथील कालीका मंदीराजवळ झोपलेला असतांना त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार केले. त्यातच त्याचा मृत्यु झाल्याची कबूलीही त्याने दिली. त्याला 17 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. ठाणो न्यायालयात शुक्रवारी हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी कळवा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)