शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ४३ टक्केच मतदान; देशात सर्वात संथ... फटका कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 17:29 IST

Maharashtra Lok sabha Voting: संध्याकाळी ५ वाजताचे आकडे यायचे आहेत. यानंतर एक तास म्हणजे सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या काळात राजकीय पक्ष मतदारांना घराबाहेर काढू शकले तर ठीक नाहीतर मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे. 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण मतदार राजाने मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे जे उमेदवार निवडून येतील ते कमी मतफरकाने असणार आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांमध्येही धाकधुक आहे. आज महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्केच मतदान झाले आहे. 

उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदानावर परिणाम झाला आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय धुरळाच एवढा उडाला आहे की मतदारही पाठ फिरवू लागले आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत वर्ध्यात ४५.९५%, अकोला ४०.६९%, अमरावती ४३.७६%, बुलढाणा ४१.६६%, हिंगोली ४०.५०%, नांदेड ४२.४२%, परभणी ४४.४९% आणि यवतमाळ मध्ये ४२.५५% मतदान झाले आहे. 

संध्याकाळी ५ वाजताचे आकडे यायचे आहेत. यानंतर एक तास म्हणजे सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या काळात राजकीय पक्ष मतदारांना घराबाहेर काढू शकले तर ठीक नाहीतर मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे. 

यवतमाळमधील हिवरी मतदारसंघामध्ये तर मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी लंच टाईमचा अर्धा तास ब्रेक घेतला होता. यामुळे येथील मतदारांना त्यांचे जेवण होण्याची वाट पाहत बसावे लागले होते. काही ठिकाणी ईव्हीएम नादुरुस्तीचेही प्रकार घडले आहेत. यामुळेही मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे. अधिकचे मतदान झाले तर त्यात सत्ताधाऱ्यांना दिलासा असतो, कमी मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसतो असे राजकीय तज्ञांचे मत आहे. यामुळे जर कमी मतदान झाले तर त्याचा फटका कुणाला बसणार असा प्रश्न चर्चिला जात आहे. 

त्रिपुरामध्ये सर्वाधिक ६९ टक्के मतदान झाले आहे. १३ राज्यांतील ८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. एकूण 16 कोटी मतदारांसाठी 1 लाख 67 हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 102 जागांवर मतदान झाले होते. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी मतमोजणीनंतर येणार आहेत. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४