शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटी जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी फक्त १०० अधिकारी

By admin | Updated: May 28, 2017 01:57 IST

राज्यातल्या ११ कोटीहून अधिक जनतेची औषध सुरक्षा फक्त १०० औषध निरीक्षकांच्या भरवशावर अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्या औषध दुकानांची तपासणी करण्यासाठी अन्न

- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातल्या ११ कोटीहून अधिक जनतेची औषध सुरक्षा फक्त १०० औषध निरीक्षकांच्या भरवशावर अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्या औषध दुकानांची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला किमान २ वर्षे लागतील. त्याहीपेक्षा वाईट अवस्था अन्न निरीक्षकांची आहे. राज्यासाठी केवळ८७ अन्न निरीक्षक कार्यरत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग १९७२ साली जन्माला आला, त्या वेळची लोकसंख्या गृहीत धरून तयार केलेल्या विभागाकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही.जगभरात जाणारी अनेक महत्त्वाची औषधे राज्यात तयार होतात. अनेक दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी देशभरातून रुग्ण महाराष्ट्रात येतात. मात्र त्यांना दिली जाणारी औषधे व अन्न दर्जेदार आहे का, हे तपासण्याची सक्षम यंत्रणा अस्तित्वातच नाही. गेल्या दोन वर्षांत तयार झालेल्या जिल्ह्यांत या विभागासाठी स्वत:चे कार्यालयही नाही. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा हा विभागच आयसीयूमध्ये आहे.लेन्टीन कमिशनच्या शिफारशीतून अन्न व औषध प्रशासन विभागाला महत्त्व निर्माण झाले. लोकसंख्या, तयार होणारी औषधे आणि अन्नधान्यांची उलाढाल लक्षात घेऊन गट ‘अ’ ते गट ‘ड’ या चार संवर्गासाठी ११७६ पदे मंजूर करण्यात आली. आज त्यातील तब्बल ४०७ पदे रिक्त आहेत. औषध निरीक्षकांच्या १६१ मंजूर पदांपैकी ६० आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या २६५ मंजूर पदांतील ८७ पदे रिक्त आहेत. हे दोन्ही अधिकारी ‘फिल्ड वर्क’ करणारे असतात. त्यांची ही अवस्था, तर अन्य पदांचा विचार न केलेला बरा.आघाडी सरकारने या विभागाला कायम दुय्यम स्थान दिले. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये एफडीए अधिकाऱ्यांचा दरारा अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा अधिक असतो. आपल्याकडे मात्र हा विभाष कायम नेतृत्वहीन राहिलेला आहे. नव्याने भरती करायची झाली की आधीच्या अधिकाऱ्यांचे आपल्यात वाटेकरी येतील, असे भाव होतात. त्यामुळे भरती होताना, कोर्टकज्जे करायचे आणि भरती रोखायची अशाही घटना या विभागात घडल्या. त्यामुळे सरकारने कठोर भूमिका घेऊन असले ‘उद्योग’ हाणून पाडायला हवेत. पण तेही कधी झाले नाहीत. त्यामुळे या विभागाची आजची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे.संवर्गमंजूर पदेरिक्त पदेगट अ१४६४३गट ब ४७७१७२गट क३७५ १३१गट ड१७८६१एकूण१,१७६४०७