शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तिखट कांद्याची गोड बातमी; पुढच्या १५ दिवसांत १५ रुपयांनी होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 02:06 IST

देशात उत्पादनात २६% घट होण्याचा अंदाज

योगेश बिडवई

मुंबई : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने किरकोळ बाजारात १00 रुपये किलोवर गेलेला आणि आता ६0-६५ रुपये किलो असलेल्या कांद्याचा राज्यात पुरवठा वाढल्याने तो महिनाअखेर ५0 रुपयांच्या खाली येण्याची स्थिती आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढत असून, मालाचा दर्जाही चांगला असल्याने देशभरातही लवकरच सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने कांद्याच्या लागवडीस व पिकालाही मोठा फटका बसला. साहजिकच, खरिपाचे उत्पादन घटून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात राज्यात कांद्याची आवक २५ लाख क्विंटल म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली होती. नोव्हेंबर महिन्यात आवक वाढून ४0 लाख क्विंटल झाली. तरीही त्यात सुमारे २५ ते ३0 टक्के घट होती. जानेवारीत आता आवक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १३ जानेवारीपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे २४ लाख क्विंटल आवक झाली आहे. तर घाऊक बाजारात क्विंटलला सर्वसाधारण भाव ३,३६६ रुपये आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात सुमारे ५५ हजार क्विंटल आवक होईल, असा अंदाज आहे. दरवर्षी जानेवारीत ६५ ते ७0 क्विंटल आवक होते, म्हणजे जानेवारीतही मागणीच्या तुलेन १0 ते १५ क्विंटल पुरवठा कमीच राहणार आहे.

मात्र दिलासादायक म्हणजे नाशिक जिल्ह्यांतील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे आदी बाजार समित्यामंध्ये आवक चांगली वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारी महिन्यात साधारणपणे एक ते सव्वा लाख क्विंटल आवक होत असते. जानेवारी महिन्यात रोज साधारणपणे एक लाख क्विंटल माल बाजारात येत आहे. शिवाय आठवडाभरापासून मालाचा दर्जाही चांगला आहे.यंदा ५२ लाख टन उत्पादन अपेक्षितभारतात २0१९-२0 मध्ये कांद्याच्या खरिप, लेट खरिप उत्पादनात साधारणपणे २६ टक्के घट होऊन ५२.0६ लाख टन होईल, असा अंदाज केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशात गेल्या वर्षी कांद्याचे ६९.९१ लाख टन उत्पादन झाले होते. 

टॅग्स :onionकांदा