शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

तिखट कांद्याची गोड बातमी; पुढच्या १५ दिवसांत १५ रुपयांनी होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 02:06 IST

देशात उत्पादनात २६% घट होण्याचा अंदाज

योगेश बिडवई

मुंबई : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने किरकोळ बाजारात १00 रुपये किलोवर गेलेला आणि आता ६0-६५ रुपये किलो असलेल्या कांद्याचा राज्यात पुरवठा वाढल्याने तो महिनाअखेर ५0 रुपयांच्या खाली येण्याची स्थिती आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढत असून, मालाचा दर्जाही चांगला असल्याने देशभरातही लवकरच सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने कांद्याच्या लागवडीस व पिकालाही मोठा फटका बसला. साहजिकच, खरिपाचे उत्पादन घटून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात राज्यात कांद्याची आवक २५ लाख क्विंटल म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली होती. नोव्हेंबर महिन्यात आवक वाढून ४0 लाख क्विंटल झाली. तरीही त्यात सुमारे २५ ते ३0 टक्के घट होती. जानेवारीत आता आवक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १३ जानेवारीपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे २४ लाख क्विंटल आवक झाली आहे. तर घाऊक बाजारात क्विंटलला सर्वसाधारण भाव ३,३६६ रुपये आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात सुमारे ५५ हजार क्विंटल आवक होईल, असा अंदाज आहे. दरवर्षी जानेवारीत ६५ ते ७0 क्विंटल आवक होते, म्हणजे जानेवारीतही मागणीच्या तुलेन १0 ते १५ क्विंटल पुरवठा कमीच राहणार आहे.

मात्र दिलासादायक म्हणजे नाशिक जिल्ह्यांतील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे आदी बाजार समित्यामंध्ये आवक चांगली वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारी महिन्यात साधारणपणे एक ते सव्वा लाख क्विंटल आवक होत असते. जानेवारी महिन्यात रोज साधारणपणे एक लाख क्विंटल माल बाजारात येत आहे. शिवाय आठवडाभरापासून मालाचा दर्जाही चांगला आहे.यंदा ५२ लाख टन उत्पादन अपेक्षितभारतात २0१९-२0 मध्ये कांद्याच्या खरिप, लेट खरिप उत्पादनात साधारणपणे २६ टक्के घट होऊन ५२.0६ लाख टन होईल, असा अंदाज केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशात गेल्या वर्षी कांद्याचे ६९.९१ लाख टन उत्पादन झाले होते. 

टॅग्स :onionकांदा