शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

बंगळुरूला कांदा नेणाऱ्या शेतकऱ्यांची झाली परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 06:47 IST

आतबट्ट्याचा व्यवहार : परतीच्या प्रवासासाठी हात पसरण्याची वेळ

- अरुण बारसकर

सोलापूर : महाराष्ट्रात कांद्याला दर मिळेना म्हणून कर्नाटकातील बंगळुरु मार्केट यार्डात ट्रकने कांदा घेऊन गेलेल्या महाराष्ट्रातील शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे. बंगळुरू मार्केटमध्ये देशभरातून कांदा घेऊन आलेल्या ट्रकच्या लांबचलांब दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कांदा ठेवायला जागाच नसल्याने नंबर येणार कधी आणि भाव मिळणार किती, याची काहीच शाश्वती नसल्याने कांदा घेऊन परतीचा प्रवास करण्यासाठी सोलापूरच्या काही शेतकऱ्यांनी पैसे मागविले आहेत.

सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून बंगळुरू मार्केटमध्ये कांदा जातो. सध्या तेथे कांदा उरतण्यासाठी जागा नसल्याने बाहेर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी २०० ते ६०० रुपये दर मिळाला. काही कांदा प्रति क्विंटल ८०० रुपयानेही विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरहून बंगळुरूला कांदा वाहतुकीसाठी प्रति टन २४०० रुपये भाडे घेतले जात आहे. एका ट्रकचे वाहतुक भाडे किमान ५६ हजार रुपये मोजावे लागते. शिवाय हमालीही द्यावी लागते. ज्यांच्या कांद्याला २०० व ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला त्यांना पदरमोड करावी लागत आहे.खाते-पोते बार झाले अन्...गावडीदारफळचे अर्जुन पवार, धर्मराज पवारसह चार शेतकरी एका ट्रकमध्ये कांदा बेंगलोरला विक्रीसाठी घेऊन गेले होते. कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये, ३०० रुपये, ३५० रुपये व ४०० रुपये दर मिळाला. ट्रकचे भाडे व बेंगलोरला जाण्यासाठी झालेला वैयक्तिक खर्च वजा जाता आतबट्ट्याचा व्यवहार झाला. कांदा उत्पादन, कांदा कापणी व भरणीचा खर्च आम्हाला सोसावा लागला, असे पवार म्हणाले. 

गुरुवारी रात्री कांदा भरुन गेलेला ट्रक शनिवारी बंगळुरुला पोहोचल्या. सोमवारी विक्री झाली. ११८ पिशव्याचे १२ हजार ५०० रुपये गाडी गेले. चार दिवसाचा खर्च वगळता हातात काहीच राहीले नाही.- श्रीकांत ननवरेकांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :onionकांदाSolapurसोलापूरBengaluruबेंगळूर