शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूला कांदा नेणाऱ्या शेतकऱ्यांची झाली परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 06:47 IST

आतबट्ट्याचा व्यवहार : परतीच्या प्रवासासाठी हात पसरण्याची वेळ

- अरुण बारसकर

सोलापूर : महाराष्ट्रात कांद्याला दर मिळेना म्हणून कर्नाटकातील बंगळुरु मार्केट यार्डात ट्रकने कांदा घेऊन गेलेल्या महाराष्ट्रातील शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे. बंगळुरू मार्केटमध्ये देशभरातून कांदा घेऊन आलेल्या ट्रकच्या लांबचलांब दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कांदा ठेवायला जागाच नसल्याने नंबर येणार कधी आणि भाव मिळणार किती, याची काहीच शाश्वती नसल्याने कांदा घेऊन परतीचा प्रवास करण्यासाठी सोलापूरच्या काही शेतकऱ्यांनी पैसे मागविले आहेत.

सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून बंगळुरू मार्केटमध्ये कांदा जातो. सध्या तेथे कांदा उरतण्यासाठी जागा नसल्याने बाहेर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी २०० ते ६०० रुपये दर मिळाला. काही कांदा प्रति क्विंटल ८०० रुपयानेही विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरहून बंगळुरूला कांदा वाहतुकीसाठी प्रति टन २४०० रुपये भाडे घेतले जात आहे. एका ट्रकचे वाहतुक भाडे किमान ५६ हजार रुपये मोजावे लागते. शिवाय हमालीही द्यावी लागते. ज्यांच्या कांद्याला २०० व ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला त्यांना पदरमोड करावी लागत आहे.खाते-पोते बार झाले अन्...गावडीदारफळचे अर्जुन पवार, धर्मराज पवारसह चार शेतकरी एका ट्रकमध्ये कांदा बेंगलोरला विक्रीसाठी घेऊन गेले होते. कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये, ३०० रुपये, ३५० रुपये व ४०० रुपये दर मिळाला. ट्रकचे भाडे व बेंगलोरला जाण्यासाठी झालेला वैयक्तिक खर्च वजा जाता आतबट्ट्याचा व्यवहार झाला. कांदा उत्पादन, कांदा कापणी व भरणीचा खर्च आम्हाला सोसावा लागला, असे पवार म्हणाले. 

गुरुवारी रात्री कांदा भरुन गेलेला ट्रक शनिवारी बंगळुरुला पोहोचल्या. सोमवारी विक्री झाली. ११८ पिशव्याचे १२ हजार ५०० रुपये गाडी गेले. चार दिवसाचा खर्च वगळता हातात काहीच राहीले नाही.- श्रीकांत ननवरेकांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :onionकांदाSolapurसोलापूरBengaluruबेंगळूर