शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : पाच वर्षांत एक कोटी रोजगार; ३० हजार किमीचे रस्ते बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:46 IST

‘संकल्पपत्रा’त भाजपचे आश्वासन : ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्याला देणार पाणी

मुंबई : राज्यात येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती, प्रत्येक बेघराला घर, ३० हजार किलोमीटरचे रस्ते, अशा अनेक आश्वासनांचा वर्षाव भाजपने आपल्या संकल्पपत्रात केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी हे संकल्पपत्र मंगळवारी जाहीर केले.

विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी योजनेत ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्यात बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठा, एक कोटी कुटुंबांना महिला बचत गटांशी जोडणे, पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या मदतीने पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडणे, पाचवीपासून शेतीवर आधारित आभ्यासक्रम, शालेय शिक्षणात स्वसंरक्षणाचे धडे, अशी आश्वासने दिली आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, कोल्हापूर, कराड या विमानतळांचा विकास करणार आणि , मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या उभारणी हे निर्धारही संकल्पपत्रात आहेत. नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो व औरंगाबादमध्ये अत्याधुनिक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच नवीन ड्रायपोर्ट उभारणार असल्याचे या संकल्पपत्रात म्हटले आहे.शहीद जवान व पोलिसांच्या कुटुंबीयांचा पुनर्वसनाचा विशेष कार्यक्रम, सर्व प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येईल, अशी आश्वासनेही भाजपने दिली आहेत.

फुले, सावरकरांना भारतरत्नसाठी पाठपुरावामहात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे.

‘अटल थाळी’ नाहीचशिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले आहे. भाजपही पाच रुपयांत अटल आहार देणार अशी चर्चा होती. मात्र, जाहीरनाम्यात या थाळीचा उल्लेख नाही.सामाजिक क्षेत्रासाठी...इंदूमिलच्या जागेवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार.अरबी समुद्रातील शिवस्मारक पाच वर्षांत पूर्ण करणारवसंतराव नाईक महामंडळासाठी ५०० कोटी रु. देणार.अनुसूचित जमातींच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ब्लॉकमध्ये एकलव्य शाळा उभारणार.मराठा, धनगर, ओबीसी, वंचित आदी समाजघटकांचा संतुलित विकास.दिव्यांगांच्या मानधनात करणार भरीव वाढ.मुंबईसाठी । केंद्रीय विद्यापीठ उभारणार । लोकल रेल्वे वाहतुकीचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध प्रकल्प । मुंबई-नागपूर मालवाहतुकीसाठी फ्रेट कॉरिडॉर.कोकणसाठी । किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापारी व प्रवासी आयातनिर्यात क्षमतेची दहा बंदरे । सर्व मच्छीमार बंदरांचा विकास । बंदरे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेने राज्याला जोडणार । मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर स्वस्त जलवाहतूक

टॅग्स :BJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019