शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Maharashtra election 2019 : पाच वर्षांत एक कोटी रोजगार; ३० हजार किमीचे रस्ते बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:46 IST

‘संकल्पपत्रा’त भाजपचे आश्वासन : ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्याला देणार पाणी

मुंबई : राज्यात येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती, प्रत्येक बेघराला घर, ३० हजार किलोमीटरचे रस्ते, अशा अनेक आश्वासनांचा वर्षाव भाजपने आपल्या संकल्पपत्रात केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी हे संकल्पपत्र मंगळवारी जाहीर केले.

विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी योजनेत ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्यात बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठा, एक कोटी कुटुंबांना महिला बचत गटांशी जोडणे, पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या मदतीने पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडणे, पाचवीपासून शेतीवर आधारित आभ्यासक्रम, शालेय शिक्षणात स्वसंरक्षणाचे धडे, अशी आश्वासने दिली आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, कोल्हापूर, कराड या विमानतळांचा विकास करणार आणि , मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या उभारणी हे निर्धारही संकल्पपत्रात आहेत. नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो व औरंगाबादमध्ये अत्याधुनिक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच नवीन ड्रायपोर्ट उभारणार असल्याचे या संकल्पपत्रात म्हटले आहे.शहीद जवान व पोलिसांच्या कुटुंबीयांचा पुनर्वसनाचा विशेष कार्यक्रम, सर्व प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येईल, अशी आश्वासनेही भाजपने दिली आहेत.

फुले, सावरकरांना भारतरत्नसाठी पाठपुरावामहात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे.

‘अटल थाळी’ नाहीचशिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले आहे. भाजपही पाच रुपयांत अटल आहार देणार अशी चर्चा होती. मात्र, जाहीरनाम्यात या थाळीचा उल्लेख नाही.सामाजिक क्षेत्रासाठी...इंदूमिलच्या जागेवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार.अरबी समुद्रातील शिवस्मारक पाच वर्षांत पूर्ण करणारवसंतराव नाईक महामंडळासाठी ५०० कोटी रु. देणार.अनुसूचित जमातींच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ब्लॉकमध्ये एकलव्य शाळा उभारणार.मराठा, धनगर, ओबीसी, वंचित आदी समाजघटकांचा संतुलित विकास.दिव्यांगांच्या मानधनात करणार भरीव वाढ.मुंबईसाठी । केंद्रीय विद्यापीठ उभारणार । लोकल रेल्वे वाहतुकीचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध प्रकल्प । मुंबई-नागपूर मालवाहतुकीसाठी फ्रेट कॉरिडॉर.कोकणसाठी । किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापारी व प्रवासी आयातनिर्यात क्षमतेची दहा बंदरे । सर्व मच्छीमार बंदरांचा विकास । बंदरे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेने राज्याला जोडणार । मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर स्वस्त जलवाहतूक

टॅग्स :BJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019