शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Maharashtra election 2019 : पाच वर्षांत एक कोटी रोजगार; ३० हजार किमीचे रस्ते बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:46 IST

‘संकल्पपत्रा’त भाजपचे आश्वासन : ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्याला देणार पाणी

मुंबई : राज्यात येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती, प्रत्येक बेघराला घर, ३० हजार किलोमीटरचे रस्ते, अशा अनेक आश्वासनांचा वर्षाव भाजपने आपल्या संकल्पपत्रात केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी हे संकल्पपत्र मंगळवारी जाहीर केले.

विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी योजनेत ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्यात बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठा, एक कोटी कुटुंबांना महिला बचत गटांशी जोडणे, पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या मदतीने पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडणे, पाचवीपासून शेतीवर आधारित आभ्यासक्रम, शालेय शिक्षणात स्वसंरक्षणाचे धडे, अशी आश्वासने दिली आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, कोल्हापूर, कराड या विमानतळांचा विकास करणार आणि , मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या उभारणी हे निर्धारही संकल्पपत्रात आहेत. नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो व औरंगाबादमध्ये अत्याधुनिक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच नवीन ड्रायपोर्ट उभारणार असल्याचे या संकल्पपत्रात म्हटले आहे.शहीद जवान व पोलिसांच्या कुटुंबीयांचा पुनर्वसनाचा विशेष कार्यक्रम, सर्व प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येईल, अशी आश्वासनेही भाजपने दिली आहेत.

फुले, सावरकरांना भारतरत्नसाठी पाठपुरावामहात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे.

‘अटल थाळी’ नाहीचशिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले आहे. भाजपही पाच रुपयांत अटल आहार देणार अशी चर्चा होती. मात्र, जाहीरनाम्यात या थाळीचा उल्लेख नाही.सामाजिक क्षेत्रासाठी...इंदूमिलच्या जागेवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार.अरबी समुद्रातील शिवस्मारक पाच वर्षांत पूर्ण करणारवसंतराव नाईक महामंडळासाठी ५०० कोटी रु. देणार.अनुसूचित जमातींच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ब्लॉकमध्ये एकलव्य शाळा उभारणार.मराठा, धनगर, ओबीसी, वंचित आदी समाजघटकांचा संतुलित विकास.दिव्यांगांच्या मानधनात करणार भरीव वाढ.मुंबईसाठी । केंद्रीय विद्यापीठ उभारणार । लोकल रेल्वे वाहतुकीचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध प्रकल्प । मुंबई-नागपूर मालवाहतुकीसाठी फ्रेट कॉरिडॉर.कोकणसाठी । किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापारी व प्रवासी आयातनिर्यात क्षमतेची दहा बंदरे । सर्व मच्छीमार बंदरांचा विकास । बंदरे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेने राज्याला जोडणार । मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर स्वस्त जलवाहतूक

टॅग्स :BJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019