शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 06:10 IST

वातावरणातील बदलाने पालवी फुटण्यास विलंब

राजेश भोस्तेकर 

अलिबाग : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची पहिली पेटी बाजारात जाण्याच्या रायगडच्या अनेक वर्षांच्या परंपरेला यंदा मात्र खंड पडणार आहे. थंडीचा हंगाम लांबण्याबरोबरच आंब्यांच्या झाडांना पालवी फुटण्यास विलंब झाला आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षी किमान दोन महिने आंब्याचे पीक लांबणीवर पडणार आहे, त्याचबरोबर उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून सांगण्यात आले. गेल्यावर्षी २५ जानेवारीला आंब्याची पहिली पेटी बाजारात आली होती. 

दरवर्षी थंडी  सुरू होण्यापूर्वी आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रायगडचा आंबा बाजारात येत असतो. सर्वात पहिल्यांदा रायगडमधील पेटी वाशीच्या बाजारात पोहोचते. त्यानंतर रत्नागिरी व अन्य ठिकाणचा मालाची आवक होते. यंदा  मात्र  खवय्यांना  रायगडच्या आंब्याची चव  उशिरा चाखावयास मिळणार आहे. फळ, शेती ही निसर्गाच्या चक्रावर चालणारा व्यवसाय आहे. पूर्वी प्रत्येक ऋतूचक्र वेळेत होत होते. मात्र आताच्या काळात प्रत्येक ऋतूच्या चक्रात बदल झाला आहे. 

बदलत्या ऋतूचा फटकापावसाळ्यात कडक ऊन, उन्हात पाऊस, तर थंडीत उन्हाळा असे ऋतू बदलत आहेत. या बदलत्या चक्राचा मोठा फटका  शेती व्यवसायाला बसला आहे.  आता थंडीही लाबल्यामुळे आंबाच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. नोव्हेंबर महिन्यात योग्य थंडी पडून मोहोर येण्याच्या पोषक काळात वातावरणात बदल झाल्याने आंबा झाडांना वेळेत मोहोर आलेला नाही आहे. 

नोव्हेंबर महिन्यात झाडाला मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटली आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांना  मोहर येऊन आंबा पिकून तयार होण्यासाठी सुमारे ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यासाठी मार्च, एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे.  आंबा बाजारात  उशिरा गेल्यास भाव कमी मिळणार असल्याचे उत्पादक धास्तावले आहेत. 

सर्वात प्रथम बाजारपेठेत दाखल होणाऱ्या रायगडचा आंबा  प्रति डझन सरासरी ५ ते ८ हजार रुपयापर्यंत विकला जातो. येथील आंबा हा भारतातच नव्हे तर परदेशातही विक्रीसाठी पाठवला जात असून, त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा मात्र  आंबा पिकांचे गणित बिघडल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. आंबा उशिरा गेल्यानंतर ग्राहकांकडून त्याला उठाव मिळेल का हा प्रश्नही उत्पादकांना सतावू लागला आहे.

झाडांना आता पालवी फुटू लागली  असून  वातावरणातील बदलामुळे मोहरही उशिरा येईल. त्यामुळे यंदा आंबा पिकविण्यासाठी वेळ लागणार. बदललेल्या वातावरणामुळे आंब्याला कीड लागण्याची शक्यता असल्याने  उत्पादकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. - डॉ. संदेश पाटील, आंबा  उत्पादक

टॅग्स :Mangoआंबा