शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 06:10 IST

वातावरणातील बदलाने पालवी फुटण्यास विलंब

राजेश भोस्तेकर 

अलिबाग : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची पहिली पेटी बाजारात जाण्याच्या रायगडच्या अनेक वर्षांच्या परंपरेला यंदा मात्र खंड पडणार आहे. थंडीचा हंगाम लांबण्याबरोबरच आंब्यांच्या झाडांना पालवी फुटण्यास विलंब झाला आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षी किमान दोन महिने आंब्याचे पीक लांबणीवर पडणार आहे, त्याचबरोबर उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून सांगण्यात आले. गेल्यावर्षी २५ जानेवारीला आंब्याची पहिली पेटी बाजारात आली होती. 

दरवर्षी थंडी  सुरू होण्यापूर्वी आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रायगडचा आंबा बाजारात येत असतो. सर्वात पहिल्यांदा रायगडमधील पेटी वाशीच्या बाजारात पोहोचते. त्यानंतर रत्नागिरी व अन्य ठिकाणचा मालाची आवक होते. यंदा  मात्र  खवय्यांना  रायगडच्या आंब्याची चव  उशिरा चाखावयास मिळणार आहे. फळ, शेती ही निसर्गाच्या चक्रावर चालणारा व्यवसाय आहे. पूर्वी प्रत्येक ऋतूचक्र वेळेत होत होते. मात्र आताच्या काळात प्रत्येक ऋतूच्या चक्रात बदल झाला आहे. 

बदलत्या ऋतूचा फटकापावसाळ्यात कडक ऊन, उन्हात पाऊस, तर थंडीत उन्हाळा असे ऋतू बदलत आहेत. या बदलत्या चक्राचा मोठा फटका  शेती व्यवसायाला बसला आहे.  आता थंडीही लाबल्यामुळे आंबाच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. नोव्हेंबर महिन्यात योग्य थंडी पडून मोहोर येण्याच्या पोषक काळात वातावरणात बदल झाल्याने आंबा झाडांना वेळेत मोहोर आलेला नाही आहे. 

नोव्हेंबर महिन्यात झाडाला मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटली आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांना  मोहर येऊन आंबा पिकून तयार होण्यासाठी सुमारे ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यासाठी मार्च, एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे.  आंबा बाजारात  उशिरा गेल्यास भाव कमी मिळणार असल्याचे उत्पादक धास्तावले आहेत. 

सर्वात प्रथम बाजारपेठेत दाखल होणाऱ्या रायगडचा आंबा  प्रति डझन सरासरी ५ ते ८ हजार रुपयापर्यंत विकला जातो. येथील आंबा हा भारतातच नव्हे तर परदेशातही विक्रीसाठी पाठवला जात असून, त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा मात्र  आंबा पिकांचे गणित बिघडल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. आंबा उशिरा गेल्यानंतर ग्राहकांकडून त्याला उठाव मिळेल का हा प्रश्नही उत्पादकांना सतावू लागला आहे.

झाडांना आता पालवी फुटू लागली  असून  वातावरणातील बदलामुळे मोहरही उशिरा येईल. त्यामुळे यंदा आंबा पिकविण्यासाठी वेळ लागणार. बदललेल्या वातावरणामुळे आंब्याला कीड लागण्याची शक्यता असल्याने  उत्पादकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. - डॉ. संदेश पाटील, आंबा  उत्पादक

टॅग्स :Mangoआंबा