शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी

By admin | Updated: October 13, 2015 04:01 IST

राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते.

पुणे : राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते. हे जरी विचित्र वाटत असलं तरी वास्तव आहे. यू-डायसच्या अहवालानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार ५३४ प्राथमिक शाळा या एकशिक्षकी आहेत. राज्यात ४६ हजार शाळांमध्ये अद्यापही विषयानुसार शिक्षक नसल्याचे सत्य या अहवालातून स्पष्ट होत आहे.केंद्र शासनाकडून दरवर्षी माहिती संकलनाचे काम यू-डायसच्या माध्यमातून केले जाते. त्यातून ही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. २०१४-१५च्या अहवालानुसार राज्यात ९७ हजार ८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ६ लाख ५६ हजार ६७३ शिक्षक आहेत. मात्र, तरीही अनेक शाळांमध्ये शिकवण्यासाठी विषयानुरूप शिक्षक नसल्याचे दिसते. तर राज्यातील ग्रामीण भागांतील ३ हजार ५३४ शाळा या एकशिक्षकी आहेत, तर ४२ हजार ४०७ शाळा दुशिक्षकी आहेत. राज्यातील तब्बल ८० हजार विद्यार्थी या एकशिक्षकी शाळांच्या माध्ममातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तो एकच असणारा शिक्षक गैरहजर असल्यास वा रजेवर गेल्यास शाळा बंद करण्याशिवाय पर्यायच नसणार हे उघड आहे. शिवाय या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच इतर प्रशासकीय जबाबदारीही याच शिक्षकांना सांभाळावी लागत आहे. यातील बहुतेक शाळा सहावी ते आठवीच्या आणि ग्रामीण भागांतील आहेत. ग्रामीण भागांतील केवळ ६९ टक्के म्हणजेच ६६ हजार ९८८ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीत. (प्रतिनिधी)