शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी

By admin | Updated: October 13, 2015 04:01 IST

राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते.

पुणे : राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते. हे जरी विचित्र वाटत असलं तरी वास्तव आहे. यू-डायसच्या अहवालानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार ५३४ प्राथमिक शाळा या एकशिक्षकी आहेत. राज्यात ४६ हजार शाळांमध्ये अद्यापही विषयानुसार शिक्षक नसल्याचे सत्य या अहवालातून स्पष्ट होत आहे.केंद्र शासनाकडून दरवर्षी माहिती संकलनाचे काम यू-डायसच्या माध्यमातून केले जाते. त्यातून ही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. २०१४-१५च्या अहवालानुसार राज्यात ९७ हजार ८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ६ लाख ५६ हजार ६७३ शिक्षक आहेत. मात्र, तरीही अनेक शाळांमध्ये शिकवण्यासाठी विषयानुरूप शिक्षक नसल्याचे दिसते. तर राज्यातील ग्रामीण भागांतील ३ हजार ५३४ शाळा या एकशिक्षकी आहेत, तर ४२ हजार ४०७ शाळा दुशिक्षकी आहेत. राज्यातील तब्बल ८० हजार विद्यार्थी या एकशिक्षकी शाळांच्या माध्ममातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तो एकच असणारा शिक्षक गैरहजर असल्यास वा रजेवर गेल्यास शाळा बंद करण्याशिवाय पर्यायच नसणार हे उघड आहे. शिवाय या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच इतर प्रशासकीय जबाबदारीही याच शिक्षकांना सांभाळावी लागत आहे. यातील बहुतेक शाळा सहावी ते आठवीच्या आणि ग्रामीण भागांतील आहेत. ग्रामीण भागांतील केवळ ६९ टक्के म्हणजेच ६६ हजार ९८८ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीत. (प्रतिनिधी)