शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दीड कोटी मुलांकडे स्मार्टफोनच नाही, ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा

By अतुल कुलकर्णी | Updated: September 18, 2020 06:34 IST

राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन शिक्षणाचा राज्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शिक्षण विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात पहिली ते बारावीच्या १,६१,९९,४९० मुलांकडे स्मार्टफोन नाही, तर राज्यातील २८,२६,४४२ मुलांकडे मोबाइल, रेडिओ अथवा टीव्ही, असे काहीच नाही. अनेक गावांत नेटवर्क मिळत नसल्याने आॅनलाइन शिक्षण हवेतच आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणत अनाकलनीय व तर्कहीन प्रकल्प राबविण्याच्या घोषणा सरकारकडून होत आहेत. तांत्रिक समज नसलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून येणा-या कल्पना गृहीत धरून टीव्ही चॅनलवरून शिक्षणाची घोषणा केली गेली; पण पाच महिने झाले तरी अजून सह्याद्री चॅनलसोबत लेखी करारदेखील झालेला नाही. यावर कडी म्हणजे एससीईआरटी संस्थेने परस्पर एमकेसीएलसोबत करार न करता सह्याद्री वाहिनीवरून विद्यार्थ्यांसाठी तासिका चालू केल्या आहेत. राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे.

अनेक गावांत नेटवर्क मिळत नाही. काही गावांत मुले झाडावर चढून नेटवर्क मिळते का ते पाहतात, तर काही ठिकाणी गच्चीवर जाऊन नेटवर्क शोधणे सुरू आहे. याबद्दल शिक्षण विभागाचे माजी संचालक आणि एसव्हीकेएम संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन आवटे म्हणाले की, आपण जे काही शिकवत आहोत, त्याकडे शिकणा-या मुलांचे लक्ष आहे का, पर्यायी शिकवण्याची निवडलेली पद्धती योग्य आहे का, याद्वारे जे शिकवले जात आहे, ते योग्य आहे का, या तीनही प्रश्नांवर आॅनलाइन शिक्षण पूर्णपणे अपयशी ठरले आहे, तर आ. कपिल पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात फक्त ३० टक्के आणि शहरी भागात ५० टक्के आॅनलाईन शिक्षण मिळत आहे. त्यामुळे शालेय वर्ष जानेवारी ते डिसेंबर करावे आणि उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्या रद्द करून दोन वर्षे एकत्र करावीत, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

पहिली ते बारावीचे राज्यातील विद्यार्थी : २,२३,५६,०३३स्मार्ट फोन असणारे विद्यार्थी : ६१,५६,५४३स्मार्ट फोन नसणारे विद्यार्थी : १,६१,९९,४९०रेडिओ असणारे विद्यार्थी : २१,८८,९५०काहीच नसणारे विद्यार्थी : २८,२६,४४२सरकारी शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १,१२,१६०खाजगी अनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १३,२४,९१३खाजगी विनाअनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : ३,६३,७९१राज्यातील एकूण शाळा : १,०९,९४२

टॅग्स :Educationशिक्षणMobileमोबाइल