शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दीड कोटी मुलांकडे स्मार्टफोनच नाही, ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा

By अतुल कुलकर्णी | Updated: September 18, 2020 06:34 IST

राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन शिक्षणाचा राज्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शिक्षण विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात पहिली ते बारावीच्या १,६१,९९,४९० मुलांकडे स्मार्टफोन नाही, तर राज्यातील २८,२६,४४२ मुलांकडे मोबाइल, रेडिओ अथवा टीव्ही, असे काहीच नाही. अनेक गावांत नेटवर्क मिळत नसल्याने आॅनलाइन शिक्षण हवेतच आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणत अनाकलनीय व तर्कहीन प्रकल्प राबविण्याच्या घोषणा सरकारकडून होत आहेत. तांत्रिक समज नसलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून येणा-या कल्पना गृहीत धरून टीव्ही चॅनलवरून शिक्षणाची घोषणा केली गेली; पण पाच महिने झाले तरी अजून सह्याद्री चॅनलसोबत लेखी करारदेखील झालेला नाही. यावर कडी म्हणजे एससीईआरटी संस्थेने परस्पर एमकेसीएलसोबत करार न करता सह्याद्री वाहिनीवरून विद्यार्थ्यांसाठी तासिका चालू केल्या आहेत. राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे.

अनेक गावांत नेटवर्क मिळत नाही. काही गावांत मुले झाडावर चढून नेटवर्क मिळते का ते पाहतात, तर काही ठिकाणी गच्चीवर जाऊन नेटवर्क शोधणे सुरू आहे. याबद्दल शिक्षण विभागाचे माजी संचालक आणि एसव्हीकेएम संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन आवटे म्हणाले की, आपण जे काही शिकवत आहोत, त्याकडे शिकणा-या मुलांचे लक्ष आहे का, पर्यायी शिकवण्याची निवडलेली पद्धती योग्य आहे का, याद्वारे जे शिकवले जात आहे, ते योग्य आहे का, या तीनही प्रश्नांवर आॅनलाइन शिक्षण पूर्णपणे अपयशी ठरले आहे, तर आ. कपिल पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात फक्त ३० टक्के आणि शहरी भागात ५० टक्के आॅनलाईन शिक्षण मिळत आहे. त्यामुळे शालेय वर्ष जानेवारी ते डिसेंबर करावे आणि उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्या रद्द करून दोन वर्षे एकत्र करावीत, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

पहिली ते बारावीचे राज्यातील विद्यार्थी : २,२३,५६,०३३स्मार्ट फोन असणारे विद्यार्थी : ६१,५६,५४३स्मार्ट फोन नसणारे विद्यार्थी : १,६१,९९,४९०रेडिओ असणारे विद्यार्थी : २१,८८,९५०काहीच नसणारे विद्यार्थी : २८,२६,४४२सरकारी शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १,१२,१६०खाजगी अनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १३,२४,९१३खाजगी विनाअनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : ३,६३,७९१राज्यातील एकूण शाळा : १,०९,९४२

टॅग्स :Educationशिक्षणMobileमोबाइल