शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटी मुलांकडे स्मार्टफोनच नाही, ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा

By अतुल कुलकर्णी | Updated: September 18, 2020 06:34 IST

राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन शिक्षणाचा राज्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शिक्षण विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात पहिली ते बारावीच्या १,६१,९९,४९० मुलांकडे स्मार्टफोन नाही, तर राज्यातील २८,२६,४४२ मुलांकडे मोबाइल, रेडिओ अथवा टीव्ही, असे काहीच नाही. अनेक गावांत नेटवर्क मिळत नसल्याने आॅनलाइन शिक्षण हवेतच आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणत अनाकलनीय व तर्कहीन प्रकल्प राबविण्याच्या घोषणा सरकारकडून होत आहेत. तांत्रिक समज नसलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून येणा-या कल्पना गृहीत धरून टीव्ही चॅनलवरून शिक्षणाची घोषणा केली गेली; पण पाच महिने झाले तरी अजून सह्याद्री चॅनलसोबत लेखी करारदेखील झालेला नाही. यावर कडी म्हणजे एससीईआरटी संस्थेने परस्पर एमकेसीएलसोबत करार न करता सह्याद्री वाहिनीवरून विद्यार्थ्यांसाठी तासिका चालू केल्या आहेत. राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे.

अनेक गावांत नेटवर्क मिळत नाही. काही गावांत मुले झाडावर चढून नेटवर्क मिळते का ते पाहतात, तर काही ठिकाणी गच्चीवर जाऊन नेटवर्क शोधणे सुरू आहे. याबद्दल शिक्षण विभागाचे माजी संचालक आणि एसव्हीकेएम संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन आवटे म्हणाले की, आपण जे काही शिकवत आहोत, त्याकडे शिकणा-या मुलांचे लक्ष आहे का, पर्यायी शिकवण्याची निवडलेली पद्धती योग्य आहे का, याद्वारे जे शिकवले जात आहे, ते योग्य आहे का, या तीनही प्रश्नांवर आॅनलाइन शिक्षण पूर्णपणे अपयशी ठरले आहे, तर आ. कपिल पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात फक्त ३० टक्के आणि शहरी भागात ५० टक्के आॅनलाईन शिक्षण मिळत आहे. त्यामुळे शालेय वर्ष जानेवारी ते डिसेंबर करावे आणि उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्या रद्द करून दोन वर्षे एकत्र करावीत, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

पहिली ते बारावीचे राज्यातील विद्यार्थी : २,२३,५६,०३३स्मार्ट फोन असणारे विद्यार्थी : ६१,५६,५४३स्मार्ट फोन नसणारे विद्यार्थी : १,६१,९९,४९०रेडिओ असणारे विद्यार्थी : २१,८८,९५०काहीच नसणारे विद्यार्थी : २८,२६,४४२सरकारी शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १,१२,१६०खाजगी अनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १३,२४,९१३खाजगी विनाअनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : ३,६३,७९१राज्यातील एकूण शाळा : १,०९,९४२

टॅग्स :Educationशिक्षणMobileमोबाइल