शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मंगळवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल ५ तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 13:28 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्दे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नविन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहनप्रवास टाळावा असे आवाहन केलं आहे.

- धीरज परबमीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नविन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहनप्रवास टाळावा असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतुक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कुठल्या पध्दतीने त्याची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस ) चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याचा काळात नविन पुलावरुनच दोन्ही बाजुची वाहतुक सुरु होती. परंतु या मुळे काही तास वाहतुक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. ९ महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतुन लहान तर एका मार्गिकेतुन मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमीत तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटने नंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. नियमीत तपासणी मध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सुत्रांनी सांगीतले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

मंगळवारीदेखील सकाळी ८ वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे. सदर तपासणीचे काम सुमारे ५ तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतुक नविन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलिस व वाहतुक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे.वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतुक शाखेचे १८ ; पालघर शाखेचे २२ तर महामार्ग वाहतुक शाखेचे ११ असे मिळुन ५१ अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहे. शिवाय पालिकेच्य वतीने ट्रॅफिक वॉर्डन सुध्दा दिले जाणार आहेत. 

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळविण्याचे सांगण्यात आले आहे. दर वीस मिनीटांनी नविन पुलावरुन एका एका बाजुची वाहनं सोडली जाणार आहेत.जगदिश शिंदे, निरीक्षक, वाहतूक पोलीस