शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यातील वृद्ध असुरक्षित, धक्कादायक वास्तव; २१,४१० गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:32 IST

महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांची फसवणूक, हत्या असे

मुंबई : महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांची फसवणूक, हत्या असे २१,४१० गुन्हे दाखल झाले. २०१४च्या तुलनेत हा आकडा २,६९३ने वाढला आहे. त्यापैकी ४,६९४ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत.आकडेवारीतली धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठांच्या सर्वाधिक हत्याही महाराष्ट्रातच घडल्या आहेत. यामध्ये १६९ वृद्धांची हत्या झाली तर ६७ वृद्धांच्या हत्येचा प्रयत्न झाला. चार वृद्ध महिलांवर बलात्कार करण्यात आला. ८०० फसवणुकीचे बळी ठरले. महाराष्ट्रातील वृद्धांच्या घरात सर्वाधिक दरोडे घालण्यात आलेले आहेत. राज्यात असे २४ दरोडे पडले आहेत. देशात ही संख्या ३९ आहे. त्यामुळे वद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अशाही दु:खद घटना...फोर्ट परिसरात राहणारे फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत चार दिवसांनंतर घरातून बाहेर काढला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेल्या पत्नी आणि मुलाकडे त्यांची भाची सांचा डिकोस्टाने संपर्क साधला.मात्र अंत्यसंस्कारासाठीही वेळ नसल्याचे सांगून मुलाने येण्यास नकार दिला. यापूर्वी ८ आॅगस्टला लोखंडवाला परिसरात घडलेल्या घटनेने तर सर्वांनाच सुन्न केले. ओशिवरा परिसरात आशा साहानी कुटुंबीयांसोबत राहायच्या.२० वर्षांपूर्वी मुलगा रुतुराज अमेरिकेला स्थायिक झाला. त्यानंतर पतीच्या आधारावर त्या जगत होत्या. २०१३मध्ये पतीचे निधन झाले आणि त्या एकट्या पडल्या. त्यानंतर एकदाच मुलाने आईसोबत संपर्क साधला. १६ महिन्यांनी तो घरी परतला तेव्हा बंद घरातून आईचा सांगाडा त्याच्या हाती लागला. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र