शहरं
Join us  
Trending Stories
1
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
2
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
3
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
4
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
5
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
6
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
7
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
8
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
9
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
10
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
11
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
12
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
13
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
15
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
17
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
18
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
19
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
20
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्मरणशक्ती कमजोर असलेली वृद्ध व्यक्ती सुखरूप घरी पोहोचली!

By admin | Updated: July 5, 2017 04:29 IST

संवेदनशील वृत्ती असेल तर एखाद्याचे दुरावलेले कुटुंब परत मिळू शकते, याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील पातूरच्या उमेश अमानकर यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संवेदनशील वृत्ती असेल तर एखाद्याचे दुरावलेले कुटुंब परत मिळू शकते, याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील पातूरच्या उमेश अमानकर यांच्या बांधीलकीतून दिसून आली आहे़ त्यांच्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असलेल्या ७८ वर्षीय रामबाबू मंगल यांची दक्षिण भारत भ्रमंती अखेर घरी येऊन थांबली़कल्याण येथील मंगल परिवार आग्रा ते हैद्राबाद रेल्वेने प्रवास करीत होता़ त्यांच्या समवेत घरातील ७८ वर्षीय रामबाबू मंगलही होते़ त्यांची स्मरणशक्ती कमजोर होती़ दरम्यान, २७ जून रोजी दुपारी २ वाजता भोपाळ रेल्वे स्टेशनवर रामबाबू उतरले़ घरच्यांना त्याची खबर नव्हती़ २८ जून रोजी भोपाळच्या रेल्वे स्टेशनवरील सीसी कॅमेरामध्ये ते दिसले़ त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही़ पुढे काय आणि कसे घडले, याची कोणालाही खबर नाही़; मात्र चार दिवसांनंतर रामबाबू थेट अकोला जिल्ह्यातील पातूर गावी पोहोचले़ तेथे ते एका रिक्षात बसले़ त्यांनी माझ्या मुलीचे कृषी सेवा केंद्र आहे, तेथे नेऊन सोडा, असे सांगितले़ रिक्षा चालकाने अख्खे पातूर दाखविले. त्यांनी कृषी सेवा केंद्र ओळखले नाही़ शेवटी रिक्षाचालक उमेश अमानकर यांना ओळखत होता़ त्यांचे रेणुका सेवा केंद्र आहे़ तिथे पोेहोचल्यावर रामबाबूंनी हेच माझ्या मुलीचे कृषी सेवा केंद्र आहे, असे सांगितले़ त्यावेळी अमानकर रिक्षाजवळ आले़ त्यांनी रामबाबूंना पाहिले; परंतु ते नातेवाईक नाहीत, याची खात्री पटली़ त्यांनी विचारपूस केली़ तुम्हाला कोठे जायचे आहे़ ते म्हणाले मी हैद्राबादमध्ये आलो आहे़ हे माझ्या मुलीचे दुकान आहे़ आधी मला घरी सोडा़ पुन्हा मी दुकानात येतो़ त्यांच्या संवादावरून अमानकर यांना त्यांच्या स्मरणशक्तीविषयी जाणीव झाली़ त्यांनी त्यांच्या खिशातून अलगदपणे ओळखपत्र व डायरी काढली़ त्या डायरीवरून संपर्क साधला़ तेव्हा मंगल परिवारातील सदस्यांनी रामबाबूंना तेथेच सांभाळावे़ काही तासात अकोल्यातील त्यांचे परिचीत येतील, हे सांगितले़; मात्र रामबाबू रिक्षाच्या खाली उतरत नव्हते़ त्यामुळे उमेश यांनी रामबाबूंना घरी पाठवतो, असे सांगून अक्षरश: दोन अडीच तास रिक्षातून फिरवत गुंतवून ठेवले़; दरम्यान हैद्राबाद मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकावर पोलिसांनी तपासणी केली होती़ नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनीही त्या मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना संपर्क केला होता़ तद्नंतर त्यांनी अमानकर यांच्याशी संवाद साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले़ नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनीही या तपास मोहिमेत मंगल परिवाराला सहकार्य केले़ ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील उमेश अमानकर यांच्या सतर्कतेमुळे रामबाबूसारखे स्मरणशक्ती कमजोर असलेले व्यक्ती कुटुंबियांना परत मिळू शकले़ हीच सामाजिक जाणीव ठेवली तर अनेक कुटुंबातील दुरावलेले सदस्य आपापल्या घरी पोहोचू शकतात़ आम्ही पोलीस दलाच्या वतीने अमानकर यांना सन्मानित करणार आहोत़