शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

जुना ढोकळा नव्याने गरम करून वाढलाय, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

By admin | Updated: January 2, 2017 07:58 IST

पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत अशीही टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत अशीही टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. आताच्या घोषणेत नवीन काय? ढोकळा जुनाच आहे, तो नव्याने गरम करून वाढलाय किंवा ढोकळा जुनाच, पण चटणी नवीन किंवा शिल्लक कांदाभजी नव्याने तळून ‘गरम’ म्हणून विकणे अशातला हा प्रकार आहे. मात्र असे शिळे, तळकट, तुपकट खाणे हे आरोग्यास शेवटी हानीकारकच ठरते. अ‍ॅसिडीटी, घसा खवखवणे, अपचन, हृदयाच्या रक्तवाहिन्यांत दोष व शेवटी झटक्याने मृत्यू संभवतो. हे असे झटके सध्या रोज पडत आहेत व माणसे मरणाच्या दारात ढकलली जात आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे.
 
मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत असताना बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. छोटूलाल हा जिवंतपणीच मेला व चारशेच्या वर लोक प्रत्यक्ष बँकांच्या रांगेत मरण पावले. त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या नवीन घोषणांचा पाऊस पाडला तो अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मोदी हे भाषणात घोषणा करतात की धमक्या देतात अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. पण डोक्याला ताप नको व नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस काही अशुभ कानी पडू नये म्हणून लोकांनी आपापल्यापरीने नवीन वर्ष आगमनाचा आनंद काटकसरीने साजरा केला. अर्थात मोदी यांच्या भाषणात तसे भीतीचे व चिंतेचे काहीच नव्हते. मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. वृत्तवाहिन्यांवरून एकप्रकारे अर्थसंकल्पातील घोषणांचा पाऊस मोदी यांनी आधीच पाडल्याने जेटली यांचे काम सोपे करून टाकले आहे. आता फेब्रुवारी महिन्यात सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय करणार हा प्रश्‍नच आहे अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चूड लावली असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेचे, मोलमजुरी करून जगणार्‍यांचे कंबरडे मोडले. आज पन्नास दिवसांनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. लोकांच्या यातनांवर मोदी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फुंकर घालतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी फार गांभीर्याने भाषण केल्याचे दिसले नाही. जे रांगेत मेले व जे आजही तडफडत आहेत त्यांचे आभार मानून मोदी यांनी नव्या घोषणांची छत्री हलवली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुळात लोकांना मोदी यांच्याकडून वेगळ्याच अपेक्षा होत्या. ‘नोटाबंदी’मुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला दिलासा कधी मिळेल याचे ठाम उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही. कारण त्यांच्याकडे बहुधा उत्तरच नसावे. दुसरे असे की, नोटाबंदीनंतर किती काळा पैसा वसूल झाला याचा आकडाही पंतप्रधानांकडे नाही. मग लोकांचे इतके निर्घृण हाल का केले ते सांगावे व नव्या वर्षात तुम्हाला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवेत ते जाहीर करावे असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.