शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटांची थप्पी

By admin | Updated: May 15, 2017 00:38 IST

सहा महिन्यांपासून पाच हजार कोटी पडून :दरमहा ४८ कोटी रुपये व्याजाचा फटका

राजाराम लोंढे ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रिझर्व्ह बॅँकेने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सहा महिने उलटले तरी राज्यातील ३१ जिल्हा बॅँकांत अक्षरश: त्यांची थप्पी लागली आहे. बॅँकांमध्ये सुमारे ५००० कोटी रुपये पडून राहिल्याने त्याचा थेट परिणाम आर्थिक ताळेबंदावर झाला आहे. ‘नाबार्ड’ने तीनवेळा तपासणी करूनही रिझर्व्ह बॅँक नोटा स्वीकारण्यास तयार नसल्याने राज्यातील जिल्हा बॅँकांना दरमहा ४८ कोटी रुपये व्याजाचा फटका बसत आहे. रिझर्व्ह बॅँकेने ८ नोव्हेंबरला ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. सुरुवातीला नोटा स्वीकारण्यास जिल्हा बॅँकांना परवानगी दिली होती. या काळात सुमारे ५००० कोटी रुपये जिल्हा बॅँकांत जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले. मात्र रिझर्व्ह बँकेने नवे चलन संबंधित बॅँकांना दिले नाही. बँकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ५०० व १००० रुपयांच्या नोटा आल्या कोठून, असा प्रश्न नाबार्ड व रिझर्व्ह बॅँकेने उपस्थित केला. त्यामुळे संबंधित खात्यांची ‘नाबार्ड’ने ‘केवायसी’ पूर्तता तपासली. काही ठिकाणी नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी चौथी तपासणीही केली. तरीही या नोटा बॅँकांत पडून आहेत. मार्च २०१७ अखेर प्रत्येक जिल्हा बॅँकेला सरासरी १० ते १५ कोटींचा फटका बसल्याने ताळेबंद कोलमडला आहे. सर्व बॅँकांची ‘केवायसी’ तपासणी पूर्ण झाली आहे. आठ-दहा दिवसांत रिझर्व्ह बॅँक जुने चलन घेण्याची शक्यता आहे. सहा महिने झाले तरी चलन तुटवडा जिल्हा बॅँकांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. एकूण गरजेच्या पाच ते १० टक्के चलन पुरवठा रोज या बॅँकांना करन्सी चेस्टकडून होतो. त्यामुळे अद्यापही व्यवहार अडखळतच सुरू आहेत.या चार बँकांत सर्वाधिक रक्कमनोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅँकांत ५०० व १००० रुपयांच्या सर्वाधिक नोटा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झाल्या. नाशिक, सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बॅँकेतही मोठी रक्कम जमा झाली. ‘केवायसी’ची कागदपत्रे तपासणीने जीर्ण ‘केवायसी’च्या पूर्तता कागदपत्रांची जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा आणि ‘नाबार्ड’ने तब्बल तीन वेळा तपासणी केली. चार तपासण्यांमुळे ही कागदपत्रे जीर्ण होण्याची वेळ आली तरी रिझर्व्ह बॅँक व नाबार्डची खात्री झालेली दिसत नाही.पाठपुरावा सुरूच : कर्नाडयाबाबत राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड म्हणाले, सहा महिने झाले राज्यातील जिल्हा बॅँकांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सुमारे ५००० कोटी रुपये पडून आहेत. याबाबत शिखर बॅँक म्हणून आम्ही रिझर्व्ह बॅँकेकडे पत्रव्यवहार केला आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती केली आहे. शुक्रवारी सोळा जिल्हा बॅँकांच्या बैठकीतही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर प्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.