शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका नाही, हवामान खात्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 06:13 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘ओखी’ या चक्रीवादळात झाले आहे. श्रीलंकेजवळ निर्माण झालेले हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘ओखी’ या चक्रीवादळात झाले आहे. श्रीलंकेजवळ निर्माण झालेले हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाचा वेग आणि प्रभाव वाढणार असला तरी गोव्यासह महाराष्ट्रातील मुंबई आणि उर्वरित किनारपट्टी क्षेत्राला ‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका तुर्तास तरी नाही, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या नियंत्रण कक्षाने दिली.गुरुवारी हे चक्रीवादळ कन्याकुमारीच्या दक्षिणेपासून ६० किलोमीटर, त्रिवेंद्रमपासून १२० किलोमीटर अंतरावर नोंदविण्यात आले आहे. पुढील २४ तासांत चक्रीवादळाचा प्रभाव आणि वेग आणखी वाढणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अरबी समुद्रातील वातावरण हे चक्रीवादळास अनुकूल असल्याने त्याचा प्रभाव आणखी वाढणार आहे. दक्षिण भारतातील काही भागांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय येथे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, चक्रीवादळाचा प्रभाव वाढत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.थंडीचा जोर वाढतोय...राज्यासह मुंबईत थंडीचा जोर कायम आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान भिरा येथे १०.५ अंश नोंदविण्यात आले आहे. राज्याचा विचार करता विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर येत्या ४८ तासांसाठी मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी येथे पडलेली थंडी मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरवणार आहे.सध्या पहाटेच्या वेळी मुंबईत गारवा असतो. दुपारी उकाडा असला तरी संध्याकाळनंतर पुन्हा गारवा सुरू होतो. काही दिवसांनी या गारव्यात वाढ होत जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस