शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

किनारपट्टीवरील कार्यालये, उद्योग २ दिवस बंद -मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 06:48 IST

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई, ठाणे, रायगडसह सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीतील सर्व कार्यालये आणि उद्योग निसर्ग चक्रीवादळामुळे ...

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, ठाणे, रायगडसह सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीतील सर्व कार्यालये आणि उद्योग निसर्ग चक्रीवादळामुळे ३ आणि ४ जूनला बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

या चक्रीवादळाबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, की ३ जूनपासून आपण पुनश्च हरिओम करणार होतो; परंतु या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी घरीच राहणे अतिशय आवश्यक आहे. कोणीही अजिबात घराबाहेर पडू नका. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ज्याप्रमाणे कोरोनाला रोखून त्याला परतवण्याच्या आपण मागे आहोत त्याचप्रमाणे या चक्रीवादळातूनही सहीसलामत बाहेर पडू.

संकटाच्या छाताडावर चाल करून आपल्याला जायचे आहे. बुधवारी दुपारपर्यंत हे वादळ धडकणार आहे. अशा वेळी नागरिकांनी विजेचा कमीत कमी वापर करावा किंवा घरातील वीज बंद ठेवावी. वीजप्रवाह खंडित करण्याचीसुद्धा वेळ येऊ शकते. घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. हंगामी शेडमध्ये वा मोडकळीस आलेल्या जागेत आडोशाला जाऊ नये. किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा प्रशासनाला सहकार्य करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी मैदानावर उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरे