शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचारी फैलावर

By admin | Updated: November 4, 2016 02:28 IST

हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत, तर महिन्याला १९ हजार ४८० शौचालये उभारण्याचे कठीण काम करावे लागणार आहे. पुढील पाच महिन्यांचे नियोजन करून दस्तुरखद्द मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कमी काम करणाऱ्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकारी, कर्मचारी यांना फैलावर घेत त्यांना कामाला लावले आहे. जिल्ह्याला अग्रस्थानी न्यायचे असेल, तर तालुक्यांनी आळस झटकून कामाला लागण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोकण विभागाचे अग्रस्थान डळमळीत होऊन आळशीपणाचे खापर रायगडकरांवर फुटण्याची शक्यता आहे. भारतातील हागणदारीमुक्त जिल्हा होण्याचा मान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला आहे. ३१ मार्चअखेर कोकण विभागाने हागणदारीमुक्तीमध्ये अग्रस्थानी राहावे, असे आवाहन मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे काम त्या दिशेने सुरु आहे. रायगड आणि पालघर यांच्या टार्गेटमध्ये विशेष फरक नसल्याने दोन्ही जिल्ह्यांना जोर लावून काम करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्याला ३१ मार्च २०१७ अखेर ९७ हजार ३९८ शौचालये बांधावी लागणार आहेत. त्यानुसार महिन्याला १९ हजार ४८०, तर दर दिवसाला ६४९ शौचालयांची निर्मिती करायची आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि पोलादपूर या तालुक्यांना अनुक्रमे २७६, ९२६,९८९, १२५० शौचालये उभारावी लागणार आहेत.२६ जानेवारी २०१७ पर्यंत उरण २५९७, महाड ६१३८, मुरुड ४१०२ शौचालये बांधावी लागणार आहेत. १९ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पनवेल ११०१५, माणगाव ९०३०, खालापूर ७४७६, रोहा ९०२३ तर, ३१ मार्च २०१७ अखेर अलिबाग ११४२१, पेण ११४११, कर्जत १४४५६, सुधागड ७२८८ शौचालये बांधावी लागणार आहेत.रायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. >अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकारायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी या सर्व तालुक्यांना आपल्या रडारवर घेतले आहे. काम कमी असणाऱ्या तालुक्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी त्यांना कामाला लावले असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे निश्चितच रायगड हागणदारीमुक्त होण्यास उपयोग होणार आहे.>टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत कमी कामाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. राजकीय सहभागाबरोबरच जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावरही लक्ष केंद्रित करून नियोजित वेळेत लक्ष्य पूर्ण करण्यात येईल.- राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी