शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचारी फैलावर

By admin | Updated: November 4, 2016 02:28 IST

हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत, तर महिन्याला १९ हजार ४८० शौचालये उभारण्याचे कठीण काम करावे लागणार आहे. पुढील पाच महिन्यांचे नियोजन करून दस्तुरखद्द मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कमी काम करणाऱ्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकारी, कर्मचारी यांना फैलावर घेत त्यांना कामाला लावले आहे. जिल्ह्याला अग्रस्थानी न्यायचे असेल, तर तालुक्यांनी आळस झटकून कामाला लागण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोकण विभागाचे अग्रस्थान डळमळीत होऊन आळशीपणाचे खापर रायगडकरांवर फुटण्याची शक्यता आहे. भारतातील हागणदारीमुक्त जिल्हा होण्याचा मान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला आहे. ३१ मार्चअखेर कोकण विभागाने हागणदारीमुक्तीमध्ये अग्रस्थानी राहावे, असे आवाहन मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे काम त्या दिशेने सुरु आहे. रायगड आणि पालघर यांच्या टार्गेटमध्ये विशेष फरक नसल्याने दोन्ही जिल्ह्यांना जोर लावून काम करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्याला ३१ मार्च २०१७ अखेर ९७ हजार ३९८ शौचालये बांधावी लागणार आहेत. त्यानुसार महिन्याला १९ हजार ४८०, तर दर दिवसाला ६४९ शौचालयांची निर्मिती करायची आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि पोलादपूर या तालुक्यांना अनुक्रमे २७६, ९२६,९८९, १२५० शौचालये उभारावी लागणार आहेत.२६ जानेवारी २०१७ पर्यंत उरण २५९७, महाड ६१३८, मुरुड ४१०२ शौचालये बांधावी लागणार आहेत. १९ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पनवेल ११०१५, माणगाव ९०३०, खालापूर ७४७६, रोहा ९०२३ तर, ३१ मार्च २०१७ अखेर अलिबाग ११४२१, पेण ११४११, कर्जत १४४५६, सुधागड ७२८८ शौचालये बांधावी लागणार आहेत.रायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. >अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकारायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी या सर्व तालुक्यांना आपल्या रडारवर घेतले आहे. काम कमी असणाऱ्या तालुक्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी त्यांना कामाला लावले असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे निश्चितच रायगड हागणदारीमुक्त होण्यास उपयोग होणार आहे.>टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत कमी कामाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. राजकीय सहभागाबरोबरच जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावरही लक्ष केंद्रित करून नियोजित वेळेत लक्ष्य पूर्ण करण्यात येईल.- राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी