शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचारी फैलावर

By admin | Updated: November 4, 2016 02:28 IST

हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत, तर महिन्याला १९ हजार ४८० शौचालये उभारण्याचे कठीण काम करावे लागणार आहे. पुढील पाच महिन्यांचे नियोजन करून दस्तुरखद्द मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कमी काम करणाऱ्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकारी, कर्मचारी यांना फैलावर घेत त्यांना कामाला लावले आहे. जिल्ह्याला अग्रस्थानी न्यायचे असेल, तर तालुक्यांनी आळस झटकून कामाला लागण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोकण विभागाचे अग्रस्थान डळमळीत होऊन आळशीपणाचे खापर रायगडकरांवर फुटण्याची शक्यता आहे. भारतातील हागणदारीमुक्त जिल्हा होण्याचा मान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला आहे. ३१ मार्चअखेर कोकण विभागाने हागणदारीमुक्तीमध्ये अग्रस्थानी राहावे, असे आवाहन मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे काम त्या दिशेने सुरु आहे. रायगड आणि पालघर यांच्या टार्गेटमध्ये विशेष फरक नसल्याने दोन्ही जिल्ह्यांना जोर लावून काम करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्याला ३१ मार्च २०१७ अखेर ९७ हजार ३९८ शौचालये बांधावी लागणार आहेत. त्यानुसार महिन्याला १९ हजार ४८०, तर दर दिवसाला ६४९ शौचालयांची निर्मिती करायची आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि पोलादपूर या तालुक्यांना अनुक्रमे २७६, ९२६,९८९, १२५० शौचालये उभारावी लागणार आहेत.२६ जानेवारी २०१७ पर्यंत उरण २५९७, महाड ६१३८, मुरुड ४१०२ शौचालये बांधावी लागणार आहेत. १९ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पनवेल ११०१५, माणगाव ९०३०, खालापूर ७४७६, रोहा ९०२३ तर, ३१ मार्च २०१७ अखेर अलिबाग ११४२१, पेण ११४११, कर्जत १४४५६, सुधागड ७२८८ शौचालये बांधावी लागणार आहेत.रायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. >अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकारायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी या सर्व तालुक्यांना आपल्या रडारवर घेतले आहे. काम कमी असणाऱ्या तालुक्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी त्यांना कामाला लावले असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे निश्चितच रायगड हागणदारीमुक्त होण्यास उपयोग होणार आहे.>टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत कमी कामाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. राजकीय सहभागाबरोबरच जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावरही लक्ष केंद्रित करून नियोजित वेळेत लक्ष्य पूर्ण करण्यात येईल.- राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी