शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:41 IST

तालुक्यातील गडचांदूर येथील उपविभाग महावितरण कार्यालय येथे सध्या कमालीचा भोंगळ कारभार सुरु असून विविध समस्या व्यतिरिक्त आता कित्येक शेतकरी, शेतमजूर व सर्वसाधारण ग्राहकांना आवाच्यासवा वीज बिल पाठवून वेठीस धरले जात आहे.

ठळक मुद्देहजारोंच्या बिलांमुळे ग्राहक त्रस्त : कनेक्शन कापण्याची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील गडचांदूर येथील उपविभाग महावितरण कार्यालय येथे सध्या कमालीचा भोंगळ कारभार सुरु असून विविध समस्या व्यतिरिक्त आता कित्येक शेतकरी, शेतमजूर व सर्वसाधारण ग्राहकांना आवाच्यासवा वीज बिल पाठवून वेठीस धरले जात आहे. अस्मानी संकटातून कसाबसा वाचलेला बळीराजा आता महावितरणाच्या सुलतानी संकटात सापडल्याचे दिसत आहे. याठिकाणी अधिकारी मस्त, विज ग्राहक त्रस्त, अशी परिस्थिती पहायला मिळत आसून महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे.असाच एक प्रकार नांदाफाटा येथे उजेडात आला असून ग्राहकांना अगोदर दोनशे ते तीनशेच्या जवळपास बिले यायची. परंतु, यंदा कित्येकांना चक्क ७५ ते ८० व ८५ हजारांच्या जवळपास विजबिल आल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांना आर्थिक छळ सहन करावा लागत आहे. त्रस्त विज ग्राहकांनी कित्येकदा स्थानिक महावितरण कार्यालयात खेटे मारले मात्र महावितरणचे अधिकारी प्रत्येकवेळा तुम्ही अगोदर बिल भरा, मग पाहु अशी उडवाउडवीची उत्तर दिली जातात. महावितरण उपकार्यकारी अभियंता यांनी विद्युत कायदा, २००३ च्या कलम ५६ (१) नुसार बिल न भरल्यास चक्क विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीसच या ग्राहकांना बजावली आहे.यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली असून वरिष्ठांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी नांदाफाटा येथील गायकवाड आणि मोहितकर यांच्यासह इतर त्रस्त विज ग्राहक महावितरणाच्या वरिष्ठांकडे केली आहे. यानंतर वरिष्ठ अधिकार कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :electricityवीज