शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation : निवडणुका पुढे ढकला, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 05:53 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेल्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले.

मुंबई : राज्यात २१ डिसेंबरला होत असलेली १०५ नगर पंचायती, दोन जिल्हा परिषदा, १५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक व चार महापालिका तसेच ४,४५४ ग्राम पंचायतीमध्ये होत असलेली पोटनिवडणूक पुढे ढकलावी, असा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाला हा प्रस्ताव देण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे आयोगाला गुरुवारी एक पत्र दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेल्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल चिंता व्यक्त करतानाच ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक राज्यात होता कामा नये याबाबत एकमत होते. राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करावी, असा सूर होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यास संमती दिली. याबाबतची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली.त्यामुळे ओबीसी आरक्षण नसेल तर निवडणूक घेऊ नका, अशी मागणी राज्य सरकारने आयोगाकडे केली तर ती मान्य होण्याची शक्यता नाही. म्हणून आता ओमायक्रॉनचे कारण देऊन या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल, अशी शक्यता आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास विस्तारित खंडपीठासमोर आव्हान देणे हा देखील एक पर्याय आहे.आयएएस अधिकारी नेमणार, पूर्ण निधीही देणारराज्य मागासवर्ग आयोग इम्पिरिकल डाटा गोळा करत असताना एका आयएएस अधिकाऱ्याची विशेष नियुक्ती केली जाईल. २००३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एस. एन. भांगे यांच्याकडे ही जबाबदारी असेल. आयोगाने ४३५ कोटी रुपयांची मागणी केली होती पण त्यांना केवळ पाच कोटी रुपयेच देण्यात आले. आयोगाला लागेल तेवढा निधी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मंजूर केला जाईल, असे मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले.

संपूर्ण निवडणूक कार्यक्रम नव्यानेसर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबरच्या अंतरिम स्थगितीनुसार राज्य निवडणूक आयोगाने २१ डिसेंबरच्या निवडणुकीतील ओबीसी राखीव जागांवरील निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित केली होती. आता या जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घ्यावी लागेल. आधीचा सर्व टप्पा रद्द होईल. या जागा आयोगास खुल्या प्रवर्गात जातील. त्यातील ५० टक्के जागा महिला राखीव करून निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करावा लागेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रOBC Reservationओबीसी आरक्षण