शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घेतली अध्यक्षपदाची शपथ

By admin | Updated: June 4, 2014 01:13 IST

लोकनेते गोपीनाथ मुंडे मुत्सद्दी व ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जायचे. भाजपच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांचे चाहते होते. अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. नागपूर शहराशी त्यांच्या अनेक आठवणी

आठवणींना उजाळा : कारागृहात घालवला होता एक दिवसनागपूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे मुत्सद्दी व ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जायचे. भाजपच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांचे चाहते  होते. अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. नागपूर शहराशी त्यांच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. १९८४-८५  मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांचा शपथ व पदग्रहण समारंभ नागपुरातील रेशीमबाग मैदानावर  आयोजित केला होता.  त्यावेळी रेशीमबाग मैदानावर मुंडे यांनी दिलेले भाषण आजही कार्यक र्त्यांंंंच्या स्मरणात आहे. त्यांच्याच  नेतृत्वात भाजपने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व प्रकारच्या  निवडणुका लढविणार्‍या या नेत्याला राज्याच्या सर्व जिल्ह्यातील पक्ष कार्यक र्त्यांंंंची नावे तोंडपाठ होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. नागपुरात जेव्हा-जेव्हा यायचे, तेव्हा ते संघ मुख्यालयाल  व स्मृती मंदिराला आवर्जून भेट द्यायचे. नागपुरात झाला होता हृद्य सत्कारभारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा पक्षाच्या वतीने नागपुरात हृद्य  सत्कार करण्यात आला होता. कार्यक्रमाला विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते नितीन गडकरी, उपनेते अण्णा डांगे,  विधानसभेतील उपनेतेद्वय डॉ. दौलतराव अहेर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना गोपीनाथ मुंडे यांनी  आपला सत्कार म्हणजे भाजपच्या सामुदायिक नेतृत्वाने दिलेली पावती असल्याचे सांगून पक्षातील एकीच्या बळावर अख्खा  महाराष्ट्र दणाणून टाकण्याची घोषणाही केली होती. कुठल्याही पक्षाच्या प्रथम श्रेणीतील नेत्यांमध्ये अपवादात्मकपणे ऐक्य  आढळते, परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता असल्यामुळे आपल्याला काम करण्यात कुठलीच अडचण येणार  नसल्याचे विधान त्यांनी केले होते.दोन दशकापूर्वी अधिवेशनादरम्यान नागपुरात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी  मोर्चेकर्‍यांवर लाठीहल्ला केला होता. त्यावेळी मुंडे यांनी कार्यक र्त्यांंंंसोबत एक दिवस कारागृहात घालवला  होता. गेल्या वर्षीही  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंडे यांच्या नेतृत्वात विधानभवानावर शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.  त्यांचे हे नागपुरातील अखेरचे आंदोलन  ठरले. मागील विधानसभा निवडणुकीत मुंडे यांनी भाजप उमेदवारासांठी नागपुरात प्रचार सभा घेतल्या होत्या. मुंडे यांचे भाषण म्हटले  की, टोलेबाजी होणार आणि ते उदंड टाळया घेणार हे ठरलेले असायचे.  प्रचारात मुंडे यांच्या सभांना मागणी असायची. लोकांची  प्रचंड गर्दी व्हायची.  (प्रतिनिधी)..अन् मुंडे फुटपाथवर बसले!२00६ सालचा प्रसंग, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशभरात एकता यात्रा काढली होती. अडवाणींच्या स्वागतासाठी  नागपूर विमानतळावर गोपीनाथ मुंडे आले होते. अडवाणींचे आगमन उशिरा होणार असल्याने त्यांच्या प्रतीक्षेत मुंडे कार्यकर्त्यांंंंसह  फुटपाथवर खुर्ची टाकून बसले होते. त्यावेळी मनमोकळ्या गप्पा केल्या होत्या. रिसोडची टेलिफोन सभा अखेरची ठरलीलोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे स्वत: उभे असल्याने त्यांना राज्यात फारशा सभा घेता आल्या नाही. विदर्भातही मोजक्याच  सभा झाल्या. अमरावती व आमगाव येथे सभा झाल्या. रिसोड येथे त्यांची सभा होणार होती. परंतु त्यांना सभेला येणे शक्य झाले  नाही. सभेला प्रंचड गर्दी जमली होती. लोकांना मुंडे यांच्या भाषणाची उत्सुकता असल्याने मुंडे यांचे टेलिफोनवरून भाषण प्रसारित  करण्यात आले. सुरक्षेचा बागुलबुवा नसायचागोपीनाथ मुंडे यांना कार्यकर्त्यांंंंत मिसळायला आवडायचे. ते स्वत : फेटा बांधायचे. एकाच दिवशी चार-पाच सभा असल्या तरी  त्यांना सभांना नकार नसायचा. सभेसाठी त्यांचे कोणत्याही स्वरूपाचे निर्देश नसायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांंंंना टेंशन नसायचे.  दौर्‍यादरम्यान मुंडे यांचा सुरक्षेचा बागुलबुवा नसायचा.संचेती, मुंडे यांच्याकडून जेवणगोपीनाथ मुंडे नागपूर दौर्‍यांवर आले की, सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचायचे. परळी येथील सहकारी साखर कारखान्याचा  आलेला फॅ क्स बघायचे. कार्यक र्त्यांंंंशी चर्चा करून कार्यक्र म ठरवायचे. त्यांचे जेवण खा. अजय संचेती वा सतीश मुंडे  यांच्याकडून यायचे.