शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

नागपुरात घेतली अध्यक्षपदाची शपथ

By admin | Updated: June 4, 2014 01:13 IST

लोकनेते गोपीनाथ मुंडे मुत्सद्दी व ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जायचे. भाजपच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांचे चाहते होते. अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. नागपूर शहराशी त्यांच्या अनेक आठवणी

आठवणींना उजाळा : कारागृहात घालवला होता एक दिवसनागपूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे मुत्सद्दी व ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जायचे. भाजपच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांचे चाहते  होते. अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. नागपूर शहराशी त्यांच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. १९८४-८५  मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांचा शपथ व पदग्रहण समारंभ नागपुरातील रेशीमबाग मैदानावर  आयोजित केला होता.  त्यावेळी रेशीमबाग मैदानावर मुंडे यांनी दिलेले भाषण आजही कार्यक र्त्यांंंंच्या स्मरणात आहे. त्यांच्याच  नेतृत्वात भाजपने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व प्रकारच्या  निवडणुका लढविणार्‍या या नेत्याला राज्याच्या सर्व जिल्ह्यातील पक्ष कार्यक र्त्यांंंंची नावे तोंडपाठ होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. नागपुरात जेव्हा-जेव्हा यायचे, तेव्हा ते संघ मुख्यालयाल  व स्मृती मंदिराला आवर्जून भेट द्यायचे. नागपुरात झाला होता हृद्य सत्कारभारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा पक्षाच्या वतीने नागपुरात हृद्य  सत्कार करण्यात आला होता. कार्यक्रमाला विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते नितीन गडकरी, उपनेते अण्णा डांगे,  विधानसभेतील उपनेतेद्वय डॉ. दौलतराव अहेर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना गोपीनाथ मुंडे यांनी  आपला सत्कार म्हणजे भाजपच्या सामुदायिक नेतृत्वाने दिलेली पावती असल्याचे सांगून पक्षातील एकीच्या बळावर अख्खा  महाराष्ट्र दणाणून टाकण्याची घोषणाही केली होती. कुठल्याही पक्षाच्या प्रथम श्रेणीतील नेत्यांमध्ये अपवादात्मकपणे ऐक्य  आढळते, परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता असल्यामुळे आपल्याला काम करण्यात कुठलीच अडचण येणार  नसल्याचे विधान त्यांनी केले होते.दोन दशकापूर्वी अधिवेशनादरम्यान नागपुरात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी  मोर्चेकर्‍यांवर लाठीहल्ला केला होता. त्यावेळी मुंडे यांनी कार्यक र्त्यांंंंसोबत एक दिवस कारागृहात घालवला  होता. गेल्या वर्षीही  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंडे यांच्या नेतृत्वात विधानभवानावर शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.  त्यांचे हे नागपुरातील अखेरचे आंदोलन  ठरले. मागील विधानसभा निवडणुकीत मुंडे यांनी भाजप उमेदवारासांठी नागपुरात प्रचार सभा घेतल्या होत्या. मुंडे यांचे भाषण म्हटले  की, टोलेबाजी होणार आणि ते उदंड टाळया घेणार हे ठरलेले असायचे.  प्रचारात मुंडे यांच्या सभांना मागणी असायची. लोकांची  प्रचंड गर्दी व्हायची.  (प्रतिनिधी)..अन् मुंडे फुटपाथवर बसले!२00६ सालचा प्रसंग, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशभरात एकता यात्रा काढली होती. अडवाणींच्या स्वागतासाठी  नागपूर विमानतळावर गोपीनाथ मुंडे आले होते. अडवाणींचे आगमन उशिरा होणार असल्याने त्यांच्या प्रतीक्षेत मुंडे कार्यकर्त्यांंंंसह  फुटपाथवर खुर्ची टाकून बसले होते. त्यावेळी मनमोकळ्या गप्पा केल्या होत्या. रिसोडची टेलिफोन सभा अखेरची ठरलीलोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे स्वत: उभे असल्याने त्यांना राज्यात फारशा सभा घेता आल्या नाही. विदर्भातही मोजक्याच  सभा झाल्या. अमरावती व आमगाव येथे सभा झाल्या. रिसोड येथे त्यांची सभा होणार होती. परंतु त्यांना सभेला येणे शक्य झाले  नाही. सभेला प्रंचड गर्दी जमली होती. लोकांना मुंडे यांच्या भाषणाची उत्सुकता असल्याने मुंडे यांचे टेलिफोनवरून भाषण प्रसारित  करण्यात आले. सुरक्षेचा बागुलबुवा नसायचागोपीनाथ मुंडे यांना कार्यकर्त्यांंंंत मिसळायला आवडायचे. ते स्वत : फेटा बांधायचे. एकाच दिवशी चार-पाच सभा असल्या तरी  त्यांना सभांना नकार नसायचा. सभेसाठी त्यांचे कोणत्याही स्वरूपाचे निर्देश नसायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांंंंना टेंशन नसायचे.  दौर्‍यादरम्यान मुंडे यांचा सुरक्षेचा बागुलबुवा नसायचा.संचेती, मुंडे यांच्याकडून जेवणगोपीनाथ मुंडे नागपूर दौर्‍यांवर आले की, सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचायचे. परळी येथील सहकारी साखर कारखान्याचा  आलेला फॅ क्स बघायचे. कार्यक र्त्यांंंंशी चर्चा करून कार्यक्र म ठरवायचे. त्यांचे जेवण खा. अजय संचेती वा सतीश मुंडे  यांच्याकडून यायचे.