शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

नान्नज गाव डिजिटलच्या दिशेने

By admin | Published: January 01, 2017 3:15 AM

सोलापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज हे गाव़ माळढोक अभयारण्यासाठी ओळखले जाणारे हे गाव सेवासुविधांपासून परिपूर्ण

सोलापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज हे गाव़ माळढोक अभयारण्यासाठी ओळखले जाणारे हे गाव सेवासुविधांपासून परिपूर्ण आहे़. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गावातील व्यवहार डिजिटल, आॅनलाइन पेमेंट व कॅशलेस व्यवहारासाठी आता पुढे येऊ लागले आहे़ गावात अनेक लहान-मोठी दुकाने आहेत़ या दुकानात आता स्वॅप, पेटीएमचा वापर वाढत आहे़ शिवाय चेकद्वारे देवाण-घेवाणीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत.नान्नज हे द्राक्षपिकांसाठी प्रसिद्ध आहे़ त्यामुळे द्राक्ष बागायतदारही आपला व्यवहार करीत असताना आॅनलाइन पेमेंट व चेकचा वापर करीत आहे़ त्यामुळे नान्नज हे डिजिटलच्या दिशेने जात आहे़गाव : नान्नजएकूण बँकांची संख्या : ३पोस्ट आॅफिस : होयएटीएमची संख्या : ०१वाहतूक सुविधा : एसटी, सोलापूर महानगरपालिकेची बससेवा, खासगी वाहतूक स्मार्टफोन धारक : ५ हजारांपेक्षा जास्त साक्षरतेचे प्रमाण : ७० टक्केइंटरनेट सुविधा : बीएसएनएल; शिवाय विविध कंपन्यांचे टॉवरवीजपुरवठा : सुरळीत आहे; चार तास भारनियमनकॅशलेस आणि डिजिटल व्यवहार : विजेचे, फोन, डिश टीव्हीचे बिल भरण्यासाठी आॅनलाइन बँकिंग; ३० टक्के लोक कॅशलेस व्यवहार करतात.चलनात बदल होणे अपेक्षितच होते़ यापूर्वीदेखील असे पाऊल उचलले गेले असते तर व्यवहारातील बनावट नोटांचे प्रमाण कमी झाले असते. कदाचित त्यावर पूर्णपणे अंकुश लागला असता. तसेच कॅशलेस व्यवहारही तेव्हाच अमलात आला असता़ भ्रष्टाचारही थांबला असता़ डिजिटल इंडियात पेपरलेसप्रमाणे कॅशलेस व्यवहार वेगाने व्हावे़ युवकांचा याकडे कल वाढलेला दिसून येतोय़ - युसूफ छप्परबंद नोटा बदलाचा या काळात चांगला फायदा होतोय़ यामुळे सर्वसामान्यांना बचतीचे आणि कॅशलेसचे महत्त्व कळाले़ आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या देशात भविष्यात जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस व्हायला हवेत़ उच्चशिक्षित महिलांना पुढे जाण्यास मदत होणार आहे़ पैसे चोरीचे धोके पूर्णत: कमी होणार आहेत़ कॅशलेसमुळे बिनधास्त आणि सुरक्षित खरेदीचा सुखद अनुभव घेतोय़ - अश्विनी इंगळे अनेक खासगी बँकांची गुंतवणूक मुक्त अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून झालेली आहे़ पंपावर गेलो असता शंभर रुपयांच्या पेट्रोलवर सेवाकर किंंवा अन्य प्रकारचा ६ रुपये कर लागतोय़ आता या काळात तो बंद असला तरी तो इतर काळात लागणारच आहे़ यामुळे कॅशलेस व्यवहार जरूर वाढेल़ परंतु शंभर रुपयांमागे ६ रुपये खूपच होतात़ याचा फायदा परदेशी गुंतवणूकदारांना होतोय़ कॅशलेस नकोच़ - अपर्णा पटणे सर्वसामान्यांपैकी सर्वच व्यक्ती कॅशलेस व्यवहार करू शकत नाहीत़ आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा देश आजही शंभर टक्के स्वयंपूर्ण वाटत नाही़ संगणकाच्या युगात निरक्षरांचीही संख्या मोठी आहे़ कॅशलेसऐवजी चलन तुटवडा दूर करून आर्थिक घडी पूर्वपदावर आणावी़ सर्वसामान्यांना ही प्रणाली परवडणारी नाही़ पुढे जाऊन मनमानी करीत कंपन्या आपला सेवाकर वाढवतील़- चिंतामणी पवार सरकारने सावधपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे़ एकीकडे पैशांची चोरी थांबेल, बँकिंग व्यवहार वाढतील़ परंतु याचा दुसरा फटका म्हणजे आॅनलाइन व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार वाढतील़ अकाउंट हॅकर्सचेही प्रमाण वाढणार आहे़ कॅशलेस व्यवहार काळाची गरज आहे, जरूर वाढवा, परंतु हॅकर्स, गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कडक कायदेही करायला हवेत़ - बन्सी वडरे